उरण तालुक्यातील चिरनेर येथील नाल्याचे पाणी घरात घुसल्यानंतर त्यात विजेचा प्रवाह उतरल्याने त्याचा शॉक लागून रामकृष्ण नारंगीकर आणि बेबी रामकृष्ण नारंगीकर या दाम्पत्याचा अंत झाला.काल दुपारी चिरनेरच्या नाल्याला पूर आल्यानंतर त्याचे पाणी अनेक घरात घुसले.त्यात मोठे नुकसान झाले.सायंकाळी पूर ओसरल्यानंतरही नारंगीकरांचे घर उघडले जात नाही हे दिसल्यानंतर ग्रामस्थांनी त्यांचा दरवाजा तोडला असता नारंगीकर पती पत्नी मृत्यूमुखी पडल्याचे आढळून आले.या घटनेमुळे चिरनेर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे– विजेचा शॉक लागून दाम्पत्याच मृत्यू