नेरळ-माथेरान दरम्यान धावणाऱ्या मिनिबसच्या अनेक फेऱ्या रद्द कराव्या लागल्याने ऐन परिक्षेच्या हंगामात विध्यार्थी आणि पालकांना जादा पैसे देऊन खासगी टॅक्शाचा वापर करावा लागत असल्याची तक्रार माथेरानकर नागरिक करीत आहेत.
अनेक अडथळ्यांवर मात करून नेरळ माथेरान मिनिबस पाच वर्षांपूर्वी सुरू झाली पण या मार्गासाठी दोनच गाड्या आणल्या गेल्या.त्यापैकी एक गाडी सतत नादुरूस्त असते.त्यामुळे परिवहन मंडळाची वाहतूक अनेकदा बंदच असते.आताही गेली आठ दिवस ही वाहतूक कोलमडली असून ती नियमित करावी अशा माथेरानकरांची मागणी आहे.