महाराष्ट्र सरकारने गेल्या काही दिवसात राज्यात सुरू केलेल्या विविध समाजोपयोगी योजनांप्रमाणेच राजीव गांधी जीवनदायी योजनेचा लाभ राज्यातील बहुसंख्य जनतेला होणार असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.
रायगड जिल्हयातील महाड येथे नव्यानेच उभारण्यात आलेल्या ट्रामा केअर सेंटरचे उद्घघाटन आणि लोकार्पण सोहळा गुरूवारी सायंकाळी पवार याच्या हस्ते करण्यात आला तेव्हा ते बोलत होते.
20 खाटाच्या ट्रामा सेंटरमुळे महामार्गावरील अपघातग्रस्तांना त्याचा उपोयग होणार आहे.यावेऴी पालकमंत्री सुनील तटकरे आणि अन्य मान्यवर उपस्थित होते.
काल अजित पवार यांचे पनवेल,मुरूड,महाड आदि ठिकाणी विविध कार्यक्रम झाले.