एका कार्टूनच्या निमित्ताने…

राजकीय पक्षांसाठी मिडिया हे सॉफ्ट टार्गेट आहे.. देशात काहीही घडले तरी त्याचे खापर मिडियाच्या माथी फोडण्यात देखील काही नेत्यांना धन्यता वाटते.. .. “मिडिया भाजपला झुकते माप देतो” ही विरोधकांची हल्लीची आवडती ओरड .ही ओरड देखील तटस्थ नाही.. मतलबी आहे… ज्यांना आपण रोखू शकत नाही त्यांना परस्पर माध्यमांनी वाटेला लावले पाहिजे असे गणित अनेक नेत्यांच्या डोक्यात असते.. म्हणजे विरोधकांना माध्यमांच्या खांद्यावर बंदुक ठेऊन लढाई लढायची आहे .. खांदा मिळाला तर तटस्थ मिडिया अन्यथा विकावू मिडिया.. विरोधकांना हल्ली तो खांदा मिळत नाही.. म्हणून तो गोदी मिडिया..नाव जरी गोदी मिडिया असलं तरी सारा राग पत्रकारावर असतो.. गल्ली पासून दिल्ली पर्यत हेच सूत्र आहे..मिडियाचा आज आपल्याला उपयोग होत नाही हे विरोधकांचं खरं दुखणं..

बरं हे सूत्रधार चालेना कुठे? या पध्दतीनं वागतात .. कसं ते बघा.. देशात पाच – पंचवीस माध्यम समुह अशी आहेत की, देशातील ९० टक्के मिडिया त्यांच्या ताब्यात आहे. .. कोण आहेत हे मालक? अर्थातच उद्योगपती.. यापैकी बहुतेकांचे अन्य व्यवसाय ही आहेत.. त्या व्यवसायांना संरक्षण मिळावे यासाठी त्यांना चॅनल, आणि वृत्तपत्र हातात लागते.. ही सारी मंडळी राजकीय संबंध ठेऊन असतात.. सत्तातराबरोबर माध्यमांच्या भूमिका बदलताना आपण बघतो.. थोडक्यात सोयीनुसार हे मालक आपल्या माध्यमाची भूमिका ठरवितात.. जो पर्यत वृत्तपत्रांचा धंदा झाला नव्हता तोपर्यंत वृत्तपत्रे तटस्थ होती आणि संपादक वृत्तपत्रांची भूमिका ठरवत होते.. माध्यमं धनदांडग्यांच्या हाती गेल्यानंतर संपादक निष्प्रभ करून टाकले गेले.. दैनिकाचे धोरण ठरविण्याचा अधिकार संपादकांना राहिला नाही.. दैनिकात जाहिरात व्यवस्थापकास जी किंमत असते तेवढी किंमत ही संपादकास उरली नाही.. नोकरी टिकविण्यासाठी, मालकांच्या सांगण्यावरून अग़लेख मागे घेताना आपण चौथा स्तंभ खिळखिळा करून टाकण्याच्या प़यत्न करणारया राजकीय व्यवस्थेला मदत करीत आहोत यांचं भानं ही संपादकांना उरत नाही..संपादकांच्या नियुक्तया राजकीय झाल्या आहेत.. आणि आपल्याला सोयीची ठरणारी व्यक्ती जाणीवपूर्वक संपादकांच्या खुर्चीवर बसविली जाते.. ती व्यक्ती मग मालकांचा अजेंडा राबवत राहते.. म्हणजे कोणाला व्यंगचित्र रेखाटायचेच असेल तर आपणास न आवडणारी भूमिका घेणारया मालकाचे रेखाटावे.. कारण आपण गोदी आहोत की नि:पक्ष मिडिया आहोत हे मालकांनी ठरविलेले असते..संपादक, पत्रकार, अॅकरने नाही..

यात अडचण अशी आहे की, सर्व राजकीय पक्ष मालकाशी चांगले संबंध ठेऊन असतात.. म्हणून ते माध्यम मालकाशी पंगा घ्यायलाही तयार नसतात.. मग मालकांची व्यंगचित्रे रेखाटून ती सोशल मिडियावर फिरविणे त्यांना कसे परवडेल? .. म्हणून ते नेहमीच मालकांना सोडून पत्रकारांना टार्गेट करीत राहतात..कारण ते आणखी सॉफ्ट टार्गेट असते.. मालक, समाज, आणि सरकारही त्यांच्या बाजुने नसते.. म्हणजे त्यांचा आवाज तुलनेत क्षीण असतो..सर्वांनाच हे माहिती असते म्हणूनच हल्ले पत्रकारांवरच होतात, नोकरया पत्रकारांच्याच जातात आणि खोटे गुन्हे देखील पत्रकारांवरच दाखल केले जातात.. याची कोठे दाद न फिर्याद.. बघा , एखाद्या दैनिकाच्या मालकावर बातमीमुळे हल्ला झाल्याचे कुणी ऐकले आहे का? पुर्वी किमान दैनिकाच्या, वाहिन्यांच्या कार्यालयावर हल्ले होत.. आता तसे ही होत नाही.. हल्ले फक्त पत्रकारांवर होतात.. महाराष्ट्रात पत्रकार संरक्षण कायदा आहे.. १२ वर्षे लढून तो पत्रकारांनी करून घेतला.. आज उपयोग काय त्याचा? कारण पत्रकारांवरील हल्ल्याचे गुन्हेच या कायद्यान्वये दाखल होत नाहीत.. परिणामतः कायद्याचं भय कोणाला राहिलं नाही.. बुट साफ करतानाचे पत्रकारांचे व्यंगचित्र रेखाटणारयांनी कायद्याची कडक अंमलबजावणी झाली पाहिजे म्हणून कधी आवाज उठविला का? नाही.. एवढेच नव्हे तर अलिकडच्या काळात तटस्थ भूमिका घेतल्यामुळे किमान दोन डझन संपादकांना आपल्या नोकरयांवर पाणी सोडावं लागलं.. पुण्यप्रसून वाजपेयी यांना नोकरी का सोडावी लागली हे जगजाहीर आहे.. सत्तेच्या विरोधात एक बातमी आली.. नागडं सत्य बाहेर आलं म्हणून सत्ता खवळली.. मग मालकाला दम दिला गेला.. वाजपेयी चॅनलच्या बाहेर पडले.. “मोदींच्या विरोधात बोलणारया वाजपेयींची नोकरी जाता कामा नये” यासाठी गोदी मिडियाच्या नावानं बोंब मारणारया किती राजकीय नेत्यांनी प़यत्न केले? एकाही नाही.. ते किंवा जनतेच्या बाजुने कायम आवाज उठविणारे निखिल वागळे यांच्या सारखे लढावू आणि कायम सत्ताविरोधी पत्रकार, संपादक आज कोठे आहेत? याची कोणी राजकीय नेत्याने कधी चौकशी केलीय? कोरोना काळात महाराष्ट्रात १२०० पेक्षा जास्त पत्रकार थेट रस्त्यावर आले.. पत्रकारांनी तटस्थ, नि:पक्ष असलं पाहिजे अशा अपेक्षा व्यक्त करणारांनी कधी मालकांना जाब विचारलाय का की, कोरोनाला संधी समजून तुम्ही पत्रकारांच्या पोटावर का पाय देताय म्हणून? . खरं तर मालकाचा बुट गरीब पत्रकाराच्या पोटावर फिरतानाचे एखादे व्यंगचित्र काढण्याची संधी राजकीय पक्षांना होती.. पण माध्यमांच्या मालकाशी पंगा कोण घेणार? म्हणून या विषयाकडंही दुर्लक्ष केलं गेलं..

मग माध्यम स्वातंत्र्याचं काय? माध्यम स्वातंत्र्य अबाधित ठेवण्याची जबाबदारी माध्यमांत काम करणारया माधयमकर्मींची जेवढी आहे तेवढीच ती राजकीय पक्ष आणि एकूणच समाजाची आहे.. परंतू पंत्येकाला माध्यम स्वातंत्र्य पेक्षा आपले राजकीय हितसंबंध महत्वाचे वाटतात.. त्यामुळे “माध्यमं आपलं सत्व हरवून बसले आहेत” असं जर कोणाला वाटत असेल तर त्याला माधयमकर्मींपेक्षाही मालक, राजकारणी आणि एकूणच समाज जास्त जबाबदार आहे.. माध्यमात आजही चांगल्या शक्ती मोठ्या संख्येनं आहेत.. त्यांना बळ देण्याची आणि त्यांच्या पाठिशी उभे राहण्याची जबाबदारी समाजाची नाही का? ती समाज पार पाडतो का? एखाद्या नि:पक्ष आणि प़ामाणिक पत्रकारावर हल्ला होतो तेव्हा निषेधाचं साधं पत्रक देखील कोणी काढत नाही.. त्यामुळे सचोटीनं पत्रकारिता करणारे प़वाहाच्या बाहेर फेकले जातात.. जे उरतात ते मग मालकांची आज्ञा शिरसावंद्य मानून नोकरी टिकवत राहतात.. त्यांना समाज मग गोदी मिडिया म्हणून शिव्या घालतो आणि त्यांची कार्टुन्स सोशल मिडियावर फिरवत राहतो.. ज्या व्यवस्थेच्या रक्षणासाठी आपण काही करीत नाही मग त्या व्यवस्थेला शिव्या घालण्याचा अधिकार तरी आपण कोठून मिळविला? माध्यमांना शिव्या घालायच्या, त्यांचे कार्टुन्स रंगवायचे, अंक जाळायचे, हल्ले करायचे असं सारं करून पत्रकारांचे मानसिक खच्चीकरण करण्याचा प्रयत्न केला जातो.. अशा प़यतनांना माध्यमकर्मी भिक घालत नाहीत किंवा घालणार ही नाहीत हा भाग वेगळा..
आणखी एक.. तटस्थ मिडिया,खरंच कोणालाच नको आहे.. प़ामाणिक पत्रकारही कोणाला चालत नाही.. या तटस्थतेचे व्याख्या देखील प़त्येक जण आपल्या सोयीनुसार करीत असतो.. आपल्याला हवं ते छापून आलं की तटस्थ मिडिया म्हणून त्याचं गुणगान गायलं जातं.. आपल्या विरोधात जेव्हा काही छापून येतं तेव्हा तो मोदी मिडिया ठरतो हे आजचं वास्तव आहे..
जाता जाता आणखी एक धोका मला सर्वांच्या निदर्शनास आणून द्यायचाय.. वर उल्लेख केल्याप्रमाणे देशातील ९० मिडिया २५ मालकांच्या ताब्यात आहे.. मिडियाची ही एकाधिकारशाही लोकशाहीसाठी देखील धोकादायक आहे.. ठीकय आज एनडीटीव्ही सारखे काही माधमं वेगळी भूमिका घेणारे आहेत पण समजा हे २५ मालक उद्या एक झाले तर? देशातील लोकशाहीला तो मोठा धोका ठरेल.. आपल्या विरोधात बातमी आली की, गोदी मिडिया म्हणून शिव्या देणारयांनी याचा विचार जरूर केला पाहिजे..

एस.एम.देशमुख

(खालील चित्र एका राजकीय पक्षाच्या Instagream Account वर झळकले आहे.. यातून माध्यमांकडे बघण्याचा त्या पक्षाचा दृष्टीकोन स्पष्ट होतो .)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here