रायगडमध्ये 480 पाणी पुरवठा योजना होणार 

0
718
रायगड जिल्हयातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी जिल्हा परिषदेच्या वतीने 480 पाणी पुरवठा योजना हाती घेण्यात आल्या असून त्यावर 80 कोटी रूपये खर्च केले जाणार आहेत.जुन्याच परंतू अर्धवट असलेल्या या सर्व योजना आहेत.
रायगड जिल्हयात दरवर्षी साडेतीन हजार मिली मिटर पाऊस पडून देखील नोव्हेंबर-डिसेंबरपासूनच पाणी टंचाई जाणवायला लागते.पाणी पुरवठ्यासाठी जिल्हा प्रशासन कृती आराखडा तयार करून टँकर आणि अन्य माध्यमातून पाणी पुरवठा करण्यासाठी दरवर्षी कोट्यवधी रूपये खर्च करते.त्यावर मात करण्यासाठी कायमस्वरूपी व्यवस्था करण्याचे नियोजन जिल्हा परिषदेने केले असून त्याचाच एक भाग म्हणून अर्धवट अवस्थेत असलेल्या पाणी पुरवठा योजना कार्यान्वित केल्या जाणार आहेत अशी माहिती जिल्हा परिषदेच्या सूत्रांनी माध्मयांना दिली.-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here