आरटीआयच्या 35 कार्यकर्त्यांवर हल्ले

0
783

चाकण येथील माहिती अधिकार कार्यकर्ते विलास दत्तात्रय बारवकर यानी आत्महत्या केल्याची बातमी या क्षेत्रात काम करणे किती कठिण झाले आहे याची कल्पना येते.बारवकर यांनी काही संवेदनशील प्रकरणं उघडकीस आणली होती.त्यातून त्यांना त्रास दिला जाऊ लागला आणि अंतिमतः त्यांच्यावर आत्महत्या कऱण्याची वेळ आली.

पत्रकारांची जी अवस्था महाराष्ट्रात आहे तशीच अवस्था माहिती अधिकार क्षेत्रातील कार्यकर्त्यांची आहे.महाराष्ट्रात गेल्या तीन महिन्यात 16 पत्रकारांवर हल्ले झाले आहेत .महाराष्ट्रात माहितीचा अधिकार देणारा कायदा 2005 मध्ये मंजूर झाला तेव्हापासून आजपर्यत 35 कार्यकर्त्यांवर हल्ले झाले,त्यांचा छळ केला गेला,त्यांना आत्महत्येस प्रवृत्त केले गेले किंवा त्यांच्या हत्तया झाल्या आहेत.माहितीचा अधिकार दिला गेला पण या क्षेत्रात काम कऱणाऱ्या सुरक्षा देण्यासाठी काहीच उपाययोजना केली गेली.केंद्राच्या व्हिसल ब्लोअरमध्ये काही तरतुदी केल्या आहेत पण अजून त्याची माहिती अनेक कार्यकर्त्यांना नाही.बारवकर यांच्यावर आत्महत्येची वेळ का आली याची चौकशी करून संबंधितांवर कारवाई झाली पाहिजे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here