Friday, April 26, 2024
Home Blog Page 376

मंत्रालय वार्ताहर संघाच्या अध्यक्षपदी प्रविण पुरो

0

मुंबई,दि.३१ (प्रतिनिधी)- मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाच्या वार्षिक निवडणूकीत अध्यक्षपदी प्रविण पुरो तर उपाध्यक्षपदी प्रमोद डोईफोडे,
कार्यवाहपदी मंदार पारकर कोषाध्यक्ष म्हणून महेश पवार विजयी झाले. तर कार्यकारीणी सदस्य म्हणून श्यामसुंदर सोन्नर, डॉ.नितीन तोरस्कर, प्रफुल्ल
साळुंखे, झहीर सिद्दीकी, प्रविण राऊत विजयी झाले.मंत्रालय वार्ताहर संघाच्या अध्यक्षपदासाठी झालेल्या अटीतटीच्या निवडणूकीत प्रविण पुरो यांना (३०), उदय तानपाठक (२९), सदानंद qशदे (२८) राजेंद्र थोरात (१६) तर सदानंद खोपकर (१२) मते मिळाली. विद्यमान अध्यक्ष थोरात यांना चौथ्या क्रमांकावर जात दारुण पराभव पत्करावा लागला.उपाध्यक्षपदासाठी झालेल्या निकराच्या लढाईत प्रमोद डोईफोडे यांना (४१),खंडुराज गायकवाड (३९), दिलीप जाधव (३२) मते मिळाली. वर्षानुर्षे वार्ताहर संघाच्या निवडणूकीत विजयी होणारे खंडुराज गायकवाड यांचा पराभव झाला हे विशेष.कार्यवाह पदासाठी झालेल्या दुहेरी लढतीत विद्यमान कार्यवाह मंदार पारकर (९१) मते मिळवून विजयी झाले. त्यांच्या विरोधात लढत देणारे संजीवन ढेरे यांना (२३)मतांवर समाधान मानावे लागले.कोषाध्यक्षपदासाठी झालेल्या लढाईत विद्यमान कोषाध्यक्ष महेश पवार (६१) मते मिळवून विजयी झाले. तर पुरुषोत्तम आवारे-पाटील यांना (५२) मते मिळवत पराभव पत्करावा लागला. कार्यकारणी सदस्य पदासाठी झालेल्या पाच जागांसाठी झहीर सिद्धीकी (६७), प्रफुल्ल साळुंखे (६६), शामसुंदर सोन्नर (५९), प्रविण राऊत(५९) तर डॉ. नितीन तोरस्कर (५४) मते मिळवून विजयी झाले.

ज्येष्ठ पत्रकार बासीत मोहसीन यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन

0

औरंगाबाद : दररोज कार्यालयातून बाहेर पडताना आमचे बासीतभाई म्हणजेच ज्येष्ठ पत्रकार तथा लोकमतचे मुख्य उपसंपादक अब्दुल बासीत मोहसीन (रा. रेल्वेस्टेशन) हे आपल्या दोन-चार सहकार्‍यांची चेष्टा करीत कार्यालयातून ‘एक्झिट’ घेत असत. आजही त्यांनी अशीच हसत-खेळत कार्यालयातून एक्झिट घेतली आणि थोड्या वेळानंतरच त्यांनी जीवनातून कायमची एक्झिट घेतल्याची दुर्दैवी वार्ता कार्यालयात येऊन धडकली. दररोज त्यांची एक्झिट कार्यालयातील प्रत्येकाला आनंद देऊन जात असे. आज मात्र त्यांची एक्झिट प्रत्येकाच्याच मनाला कायमचीच चटका लावून गेली.

शनिवारी रात्री हृदयविकाराने राहत्या घरी त्यांचे निधन झाले. मृत्युसमयी ते ५९ वर्षांचे होते.

सुजीत आंबेकर सातारा जिल्हापत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे निमंत्रक

0

सातारा जिल्हा पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीच्या निमंत्रकपदी सुजीत बाळासाहेब आंबेकर यांची नियुक्ती करण्यात आली आव्याची माहिती महाराष्ट पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे निमंत्रक एस एम देशमुख यांनी काल सातारा येथे दिली.
समितीच्या अन्य सदस्यांमध्ये विनोद सूर्यनारायण कुळकर्णी,शरद तात्यासाहेब काटकर,हरिष यशवंत पाटणे,मधुसुदन पत्की यांचा समावेश आहे.
जिल्हयातील पत्रकारांवर होणाऱ्या हल्ल्याच्या विरोधात आवाज उठविण्याचं काम समिती करणार आहे.तसेच पत्रकार पेन्शन योजना आणि  पत्रकारांच्या अन्य प्रश्नासाठीही समिती लढा देईल.येत्या 17 फेबुवारी रोजी राज्यातील डीआय़ओ कार्यालयांना घेराव घालण्यात येणार आहे.हे आंदोलन साताऱ्यात यशस्वी करून दाखव्विमार असल्याची माहिती सुजित आंबेकर यांनी दिली.

स्व.शंकरराव चव्हाण पत्रकार कल्याण निधीची पुनर्रचना

0
अधिस्वीकृती समितीची चार वर्षांपूर्वी मुदत संपल्यानंतर आज पर्यत या समितीची पुनर्रचना केली गेलेली नाही.वारंवार सरकारकडे या संदर्भात अर्ज विनंत्या केल्यानंतरही सरकार अधिस्वीकृती समिती पुनर्गठित करीत नाही.या संदर्भात मराठी पत्रकार परिषदेने जेव्हा जेव्हा मुख्यमंत्र्यांची भेट घेतली तेव्हा तेव्हा समितीवर जाण्यासाठी असंख्य पत्रकारांच्या शिफारशी आल्याने अडचणी येत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.माहिती आणि जनसंपर्क विभागाचे अधिकारी देखील या संदर्भात कमालीचे उदासिन असल्याचे दिसतात.किंबहुना अधिस्वीकृती समिती गठित न झालेलीच बरी असेच त्यांना वाटते कारण समिती गठित होत नसल्याने कोणाला अधिस्वीकृती द्यायची किंवा कोणाला नाही हे अधिकारीच ठरवितात.
अधिस्वीकृती समिती गठित कऱण्यात अनुत्सुक असलेल्या अधिकाऱ्यांनी शंकरराव चव्हाण पत्रकार कल्याण निधीच्या पहिल्या विश्वस्त मंडळाची मुदत संपताच ती बदलली.6 जानेवारीला पारित करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार खालील नव्या सदस्यांना पत्रकार कल्याण निधीवर घेण्यात आले आहे.
1) मधुकर कांबळे (ठाणे )
2) शुभांगी खापरे  ( मुंबई)
3) चंदुलाल शङा    ( नाशिक)
4) अ़रूण खोरे   ( पुणे )
5) माधव कदम       ( कणकवली)
6) लक्ष्मण राऊत     (जालना)
7) दिलीप एडतकर    ( अमरावती )
संघटनाचे प्रतिनिधी
—————————————————————–
1) मराठी पत्रकार परिषद
2) महाराष्ट्र दैनिक वृत्तपत्र संघटना
3) मंत्रालय आणि विधीमंडळ वार्ताहर संघ
4) बृहन्ममुंबई जिल्हा वृत्तपत्र संपादक संघ
5) महाराष्ट्र सात्पाहिक वृत्तपत्र संपादक परिषद
6) महाराष्ट्र संपादक परिषद
7)इलेक्टॉनित माध्यमे पत्रकार संघटना
8) महाराष्ट्र श्रमिक पत्रकार संघ
शासकीय सदस्य
————————————————————-
1) प्रधान सचिव -माहिती आणि जनसंपर्क (अध्यक्ष)
2) महासंचालक माहिती व जनसंपर्क – सदस्य
3) संचालक (माहिती)                     सदस्य सचिव
4) उपसंचालक (लेखा)                     खजिनदार
5) उपसंचालक ( सार्वजनिक आरोग्य)       सदस्य
पत्रकारांना तातडीची मदत देण्यासाठी गठित करण्यात आलेल्या उपसमितीवरील यंशवंत पाध्ये आणि राही भिडे यांच्या जागेवर आता मधुकर कांबळे आणि शुभांगी खापरे यांची नियुक्ती कऱण्यात आली आहे.
कल्याण निधीवरील सर्व नवनियुक्त सदस्यांचे अभिनंदन.समितीवरील सर्व पत्रकार मित्रांना विनंती की,या समितीचा जास्तीत जास्त गरजू पत्रकारांना लाभ होईल या दृष्टीने प्रयत्न व्हावेत ही विनंती

पत्रकारांना राजकारणात संधी देण्यास राजकीय पक्ष उत्सुक

0

पत्रकारितेत प्रामाणिकपणे काम करणाऱ्या पत्रकारांना चांगले दिवस येऊ घातले आहेत असे दिसते.दिल्लीत केजरीवाल यानी दोन पत्रकारांना मंत्री केल्याने आणि आणखी काही पत्रकारांना आपचे सदस्य व्हायला निमंत्रित केल्याने देशातील पत्रकारांना राजकारणाबद्दल आकर्षण वाटायला लागले आहे.पत्रकारंाचा ओघ आप कडे लागला आहे.
माध्यमकर्मीना आपल्याकडे आकर्षित करण्यात केजरीवाल यशस्वी होत असल्याचे पाहून आपले मनसे प्रमुख राज साहेब यांनीही आता माध्यमांबददल ममत्व दाखवायला सुरूवात केली आहे असे संकेत आहेत.राज ठाकरे यांनी नाशिकमध्ये आगामी लोकसभा निवडणुकीसाठी स्वच्छ चेहऱ्यांच्या व्यक्तींंना उमेदवारी देण्याचे संकेत दिले आहेत.यात शिक्षण,आरोग्य क्षेत्राबरोबरच माध्यमातील व्यक्तीचाही समावेश असणार आहे.राज ठाकरे यांनी सरप्राईज उमेदवार देण्याचं नक्की केल्याने काही पत्रकारांना मनसेच्या उमेदवारीची लॉटरी लागू शकते.स्वागतार्ह गोष्ट आहे.
यापुर्वी केवळ शिवसेनेने पत्रकारांना राजकीय क्षेत्रात काम कऱण्याची संधी दिली होती.नारायण आठवले,संजय निरूपण,भरतकुमार राऊत,संजय राऊत यांना शिवसेनेनेच राज्यसभेवर पाठविले होते.कॉग्रेस किंवा राष्ट्रवादीने मात्र पत्रकारांना केवळ चॉकलेटच दिले.अनेक पत्रकारांकडून सोनिया स्तुतीची कवणे गाऊन घेतल्यानंतरही त्यांना राज्यसभा किंवा विधानपरिषदेचा दरवाजाही दाखविला गेला नाही.असे अनेक ज्येष्ठ संपादक आजही मनोभावे सोनिया स्तुती गाताना दिसतात. परंतू स्वच्छ प्रतिमेचे चेहरे अन्य पक्ष देत असतील तर कॉग्रेसलाही याकडे दुर्लक्ष करता येणार नाही.

पत्रकारांचा विमा,कळंब तालुका पत्रकार संघाचा अनुकरणीय उपक्रम

0

उस्मानाबाद जिल्हयातील कळंब तालुका पत्रकार संघाच्यावतीनं पत्रकारितेत उल्लेखनिय कामगिरी करणाऱ्या तालुक्यातील आणि जिल्हयातील पत्रकारांचा विविध पुरस्कारांनी  बुधवारी गौरव करण्यात आला.या कार्यक्रमास मी प्रमुख पाहुणा म्हणून उपस्थित होतो.राजकीय विश्लेषक तथा ज्येष्ठ पत्रकार अभय देशपांडे , जयप्रकाश दगडे,सकाळचे खंदारे,दिव्य मराठीचे श्रीपाद सबनीस आदि मान्यवर यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते.वडवणी तालुका पत्रकार संघाचे अनिल वाघमारे मुद्दाम कार्यक्रमास उपस्थित होते.
या कार्यक्रमाची दोन वैशिष्य्य़ मला दिसली.पहिले म्हणजे नगराध्यक्ष सोडले तर व्यासपीठावर कोणाही राजकीय पुढाऱ्यांना बोलावलं गेलं नाही.रायकीय मंडळी होती पण ती समोर.राजकारणी आपल्या व्यासपीठावर येतात,आपल्यालाच बोधामृत पाजतात .राजकारण्यांना आत्मपरिक्षण करण्याची गरज असताना पत्रकारांनी आत्मपरिक्षण करण्याचे सल्ले ते देत असतात.ते चालवून घेण्याचंंंंं कारण नाही हे कळंबकर पत्रकारांनी दाखवून दिलं.
दुसरं वैशिष्ठ्य असं की,कळंबच्या पत्रकारांमधील अभिनंदनीय एकजूट.शहरातील साऱ्या पत्रकार मित्रांनी एकत्र येत अत्यंत देखणा कार्यक्रम घेतला.पाचशेच्यावर पत्रकार,नागरिक उपस्थित होते.
कळंबच्या पत्रकारांचं आणखी एका कारणासाठी खास अभिनंदन केलं पाहिजे.सरकार पत्रकारांसाठी काही करीत नाही याची जाणीव एव्हाना साऱ्यांनाच झालीय.या पार्श्वभूमीवर कळंंब पत्रकार संघाने पत्रकारांसाठी विमा योजना राबविली आहे.याचा लाभ तालुक्यातील पत्रकारांना होणार आहे.उत्तर आय़ुष्यात किंवा एखादा अपघात झाला तर विम्यामुळं पत्रकारांना कोणासमोर लाचार होण्याची वेळ येणार नाही.या कार्याबद्दल कळंब तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष सतीश टोणगे ,सतीश मडके तसेच त्यांच्या अन्य सर्व सहकाऱ्यांना मनापासून धन्यवाद.राज्यातील इतर तालुका पत्रकार ंसंघानी देखील आता याचे अनुकरण करण्याची गरज आहे.यावेळी विमा योजनेसाठी उपस्थितांनी आर्थिक मदत जाहीर करून पत्रकारांच्या पाठिशी समाज उभा असल्याचे दाखवून दिले.नगराध्यक्षांसह ज्यांनी ज्यांनी कळंब तालुका पत्रकार संघास मदत केली त्यासर्वांना धन्यवाद.
उपस्थित सर्वच पाहुण्यांनी पत्रकारांनी एक होण्याची,आपल्या हक्कासाठी लढण्याची आणि ही लढाई लढताना समाजालाही बरोबर घेण्याचे आवाहन पत्रकारांना केले.

9 फेब्रुवारी रोजी मराठी पत्रकार परिषदेची पुण्यात मह्त्वाची बैठक

0

75 वर्षांची दैदिप्यमान परंपरा आणि राज्यातील आठ हजार पत्रकार सदस्य असलेल्या मराठी पत्रकार परिषदेच्या पदाधिकाऱ्यंाची एक महत्वाची बैठक काल पुणे येथील जिल्हा पत्रकार संघाच्या कार्यालयात झाली.बैठकीत 9 फेब्रुवारी रोजी परिषदेच्या विस्तारित कार्यकारिणीची बैठक पुण्यात घेण्याचे नक्की झाले आहे.9 तारखेच्या बैठकीत पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तयाबाबत निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.तसेच तालुका पत्रकार संघातील पत्रकारांची वाढती संख्या लक्षात घेऊन प्रत्येक तालुका संघ थेट परिषदेला जोडण्याबाबतचा आणि त्यानुषंगाने घटना दुरूस्ती कऱण्याचा निर्णय़ घेतला जाण्याची शक्यता आहे.बैठकीस प्रत्येक जिल्हा अध्यक्ष आणि परिषद प्रतिनिधींनी उपस्थित राहावे असे आवाहन परिषदेचे अध्यक्ष किऱण नाईक,कार्याध्यक्ष चंद्रशेखर बेहेरे आणि सरचिटणीस संतोष पवार यांनी केले आहे.
राज्यातील अनेक जिल्हा पत्रकार संघाच्या निवडणुका झालेल्या नाहीत.अशा जिल्हा संघांनी तातडीने निवडणुका घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.जे संघ मुदत संपल्यानंतरही निवडणुका घेत नाहीत अशा जिल्हा संघांवर कडक कारवाई करण्याचे बैठकीत नक्की करण्यात आले.
बैठकीत जालना आणि नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या निवडणुकांचा कार्यक्रम नक्की कऱण्यात आला.नांदेडची निवडणूक 16 फेब्रुवारीला होत आहे.पुणे जिल्हा पत्रकार संघाचे कार्याध्यक्ष  बापू गोरे हे नांदेड निवडणुकांसाठी निरिक्षक म्हणून नियुक्त करण्यात आले आहेत.
बैठकीच्या आरंभी ज्येष्ठ पत्रकार सुधाकर डोईफोडे आणि नामदेव ढसाळ यांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.
बैठकीस सर्वश्री एस.एम.देशमुख,सुभाष भारव्दाज,शरद पाबळे,बापू गोरे,राजेंद्र कापसे,सुनील वाळूज,राजेंद्र कापसे,केशव घोणसे पाटील,चारूदत्त चौधरी आदि उपस्थित होते.

जंजिरा मुक्तीचा उपेक्षित लढा

0
  1. 15 ऑगस्ट 1947 रोजी  देशाला स्वातंत्र्य मिळालं.सारी संस्थानं भारतात विलिन झाली.अपवाद होता तो,जुनागड,हैदराबाद,जम्मू-काश्मीर आणि मुरूड जंजिरा संस्थानचा.जुनागड,हैदराबाद आणि जंजिरा संस्थानात राजे मुस्लिम होते.प्रजा हिंदू होती.जम्मू-काश्मीरमध्ये मात्र राजा हिंदु आणि बहुसंख्य प्रजा मुस्लिम होती.जुनागड,हैदराबादच्या नबाबांना भिती अशी वाटत होती की,स्वतंत्र भारतात आपण विलिन झालो तर आपल्याला सन्मानाची वागणूक मिळणार नाही.त्यामुळं ते पाकिस्तानशी संधान बांधून होते.आपण पाकिस्तानात विलिन व्हावे असा त्यांचा प्रयत्न होता.जंजिऱ्याचा नबाबही याच मताचा.त्यालाही पाकिस्तानात विलिन व्हावं असंच वाटत होतं.त्यासाठी त्याचा ही खटाटोप सुरू होता.हैदराबादला पाकिस्तानात विलिन होण्याचं स्वातंत्र्य देणं जेवढं धोक्याचं होतं तेवढंच जंजिऱ्याच्या नाबाबालाही असा अधिकार देणं अखंड हिंदुस्थानच्या कल्पनेला मारक ठरणारं होतं.हे स्वातंत्र्यप्रेमी जनतेच्या जसं लक्षात आलं होतं तसंच ते भारत सरकारच्याही लक्षात आलं होतं.मात्र भारत सरकारचा प्रयत्न असा होता की,हे सामिलीकरण कोणताही रक्तपात न होता अन्य संस्थानासारखं सुरळीत व्हावं.त्यासाठी सरकारी पातळीवर प्रयत्न सुरू होते.तथापि या प्रयत्नांना हैदराबाद,जुनागड किंवा जंजिऱ्याचा नबाब दाद देत नव्हता.अखेरिस वल्लभभाई पटेल यांनी या संस्थानावर लष्करी कारवाई करण्याचा नि र्णय धेतला.हैदराबाद संस्थानावर पोलिस ऍक्शन झाल्यानंतर निझाम  चारच दिवसात शरण आला.हैदराबाद संस्थान 17 सप्टेबरला 1948 ला स्वतंत्र झालं.म्हणजे भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर मराठवाडा तेरा महिन्यांनी स्वतंत्र झाला.हैदराबादेत लष्करी कारवाई करावी लागली पण तशी वेळ जंजिऱ्यात आली नाही.स्वातंत्र्यप्रेमी जनतेच्या दबावापुढं निजामाला दबाव लागलं. अखेर र कोणाचंही रक्त न सांडताच जंजिरा संस्थान भारतात विलीन झालं.तो दिवस होता 31 जानेवारी 1948 चा.म्हणजे देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर तब्बल साडेपाच महिन्यांनी मुरूड जंजिरा संस्थानातील  म्हणजे आजच्या मुरूड,श्रीवर्धन आणि म्हसळा तालुक्यातील जनता स्नतंत्र झाली.दुर्दैवानं मुरूडचं स्वातंत्र्य राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या हत्येच्या पार्श्वभूमीवर मिळाल्यामुळं असेल किंवा जंजिरा संस्थान अवख्या तीन तालुक्यापुरतंच छोटं  असल्यानं असेल पण जंजिरा मुक्ती लढ्याची इतिहासानं पाहिजे तेवढी नोद घेतली नाही.थोडक्यात रक्तपात न होता मिळालेल्या या स्वातंत्र्याची तेव्हा आणि आजही सरकारी पातळीवर उपेक्षाच झाली.त्याची खंत या लढ्यातले आज हयात असलेल्या स्वातंत्र्य सैनिकांना नक्तीच आहे.आम्हाला मानधन देऊ नका,आम्हाला सवलती देऊ नका पण किमान आम्ही स्वातंत्र्य सैनिक होतो हे तरी सराकरी पातळीवर मान्य करा असा जंजिरा मुक्ती लढ्यातील आज हयात असलेल्या काही स्वातंत्र्य सैनिकांचा आग्रह आहे .तो पूर्ण करायला काहीच हरकत नाही.सरकारला त्याकडं लक्ष ध्यायला वेळ नाही.ही खरी शोकांतिका आङे.मराठवाडा मुक्ती दिन म्हणजे 17 सप्टेबंर रोजी मराठवाड्यात तो दिवस उत्साहात साजरा केला जातो.सार्वजिक सुटी दिली जाते.त्याच ध र्थीवर जंजिरा संस्थानातील तीन तालुक्यात किंवा रायगड जिल्हयात जंजिरा मुक्ती दिन साजरा व्हावा ही रायगडातील पत्रकारांची आणि जनतेची मागणीही पूर्ण होत नाही.या लढ्याची उपेक्षा झाल्यानं जंजिरा मुक्तीचा लढा रायगड जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनाही माहित नाही. प्रारंभी म्हटल्याप्रमाणं जंजिरा मुक्ती लढयाचं वैशिष्टय असं आहे की,रक्त न सांडता,शासकीय हस्तक्षेपाखेरिज किंवा सरकारी मदतीशिवाय केवळ  जनतेनं  जिंकलेला हा एकमेव लढा असावा.त्यासाठी मात्र जनआंदोलनाचा रेटा वाढवत नेण्याची गरज होती.ते काम नानासाहेब पुरोहितांनी केलं.जंजिरा संस्थान स्वतंत्र भारतात विलिन व्हावं यासाठी जो लढा दिला गेला त्याचं नेतृत्व नानासाहेबंानी केलं होतं.त्यासाठी 1946 पासूनच जमवाजमव सुरू होती.हा लढा सुनियोजित पध्दतीनं पुढं नेण्यासाठी जंजिरा संस्थानातील स्वातंत्र्य प्रेमी जनतेची एक परिषद मुंबईत भरविण्यात आली होती.तिथं प्रजा परिषद नावाची संघटना स्थापन करून तिच्या नेतृत्वाखाली जंजिरा मुक्ती लढा लढण्याचं ठरविण्यात आलं.प्रजा परिषदेचं पहिलं अधिवेशन दिवेआगरला न.वि.गाडगीळाच्या अध्यक्षतेखाली भरलं.त्यानंतर नाना पुरोहितंांनी नांदवीला बैठक घेऊन पुढील कार्यक्रमाची आखणी केली.या वेळीच नाना पुरोहितांनी आपली भूमिका स्पष्ट केली.ते म्हणाले “आपली मोहिम मुस्लिमाच्या विरोधात नाही.व्यक्तिशाः नबाबाच्या विरोधातही नाही.मात्र सस्थानाचा पिवळा डाग कुलाबा जिल्ह्यात नको आहे तो निपटून काढायचा आहे”.नानानी उपस्थितांना प्रश्न केला तुमची हरकत नाही ना?हरकत नाही असा प्रतिसाद मिळाला.अन तिथंच ठरलं.26 जानेवारी 1948 रोजी खामगावला जमायचं.वाळंद खोरे आणि मुंबईतील काही मंडळी बरोबर घेऊन नानासाहेबांनी खामगावकडं कूच केली.प्रथम म्हसळयावर स्वारी होणार होती.ते पडलं की,श्रीवर्धन घ्यायचं असं नियोजन ठरलं होतं.28 जानेवारी रोजी नानासाहेब म्हसळ्यात गेले.तेथील मामलेदाराला भेटले.आपली भूमिका त्यांना संागितली.संस्थानातील मुस्लिम जनतेलाही नानासाहेब भेटले.त्यांच्याशी विलिनीकरणाच्या मुद्दयावर च र्चा केली.नानासाहेब अशा प्रकारे वातावरण तयार करीत असतानाच nababla  त्याची खबर लागली.स्वातंत्र्य सैनिकांना रोखन्यासाठी हजार हत्यारबंद सैनिकं निजामानं म्हसळ्याला पाठविले.आता घणघोर लढाई होणार असा सारा माहोल होता.स्वातंत्र्य सैनिकांना रक्ताचा थेंबही न सांडता हे युध्द जिंकायचं असल्यानं कोणताही आतताईपणा न करता स्वातंत्र्य सैनिकांच्यावतीनं मोहन धारिया यांना निजामाच्या सैनिकांशी च र्चा कऱण्यासाठी पाठविण्यात आलं.धारिया गेले पण त्यांना परतायला उशीर झाला.तेवढ्यात धारिया यांची ह त्या झाल्याची अफवा उठली. दृवातंत्र्यसैनिक भडकले.संतप्त झालेल्या स्वातंत्र्यसैनिकांचा हत्यारबंद मोर्चा म्हसळ्यात घुसला.तथापि स्वातंत्र्य सैनिकांचा आवेश बधून गर्भगळित झालेल्या निजामाच्या सैनिकांनी पांढरे निशाण दाखविले.मामलेदारांनीही मुकाटयानं कोषागाराच्या चाव्या आणि कागदपत्रांचा ताबा स्वातंत्र्यसैनिकांकडं दिला.म्हसळा पूर्णतः दृवातंत्र्यसैनिकांच्या ताब्यात आले.थोडक्यात म्हसळा पडले.स्वतंत्र झाले,म्हसळ्याचा कारभार स्वातंत्र्यसैनिक बघू लागले.म्हसळ्यातील या घटना शेजारीच असलेल्या श्रीवर्धनला पोहचायला वेळ लागला नाही.कवळ धाकानंच श्रीवर्धनचा मामलेदारही शरण आला.त्यासाठी स्वातंत्र्यप्रेमी जनतेला काहीच करावं लागलं नाही.जंजिरा संस्थानचा पायाच खचला.म्हसळा आणि श्रीवर्धनवर स्वातंत्र्यप्रेमी जनतेच्यावतीनं प्रशासक नेमला गेला.म्हसळ्याचा कारभार पाहण्यासाठी हरिभाऊ भडसावळे यांना मुख्यमंत्री नेमन्यात आले.म्हसळा 28ला पडले.श्रीवर्धन पडले ती ताऱिख होती 30 जानेवारी.दोन दिवसातच जंजिऱ्याच्या नबाबाचा खेळ खतम झाला होता.दुर्दैवानं म्हसळा-श्रीवर्धन जिंकल्याचा आनंद स्वातंत्र्यप्रेमी जनतेला साजरा करता आला नाही.श्रीवर्धनवर तिरंगा फडकविला जात असतानाच तिकडं राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची हत्या झाल्याची बातमी आली.आनंदावर विरजन पडले.गांधीच्या हत्येच्या बातमीनं जंजिरा मुक्तीचा लढा झाकोळला गेला.त्यानंतर या अदंभूत लढ्याची कायम उपेक्षा होत गेली.जंजिरा मुक्तीचा हा लढा भारताच्या इतिहासातील एक सोनेरी पर्व आहे.जनआंदोलनापुढं निजामाला नतमस्तक व्हावं लागलं.मराठ्यांना जंजिरा कधीच जिंकता आला नाही.तो अजिंक्य होता असं म्हटलं जातं.पण अवध्या तीन दिवसात जनतेनं जंजिऱ्याची प्रदिर्घ अशी राजवट संपवून टाकली.जंजिरा जिंकला.खरं तर हैदराबाद प्रमाणंच जंजिऱ्याचं करायचं काय ?  असा पेच सरकार पुढं होता.प्रारंभी म्हटल्याप्रमाणं गुंता असा होता की,राजा मुस्लिम असल्यानं जंजिऱ्यावरील कोणतीही कारवाई मुस्लिम विरोधी आहे असा प्रचार जनतेत होईल अशी भिती सरकारला वाटत होती.त्यामुळंच हैदराबाद असो की.जंजिरा बाबत सरकार वेट थांबा  आणी पाहा  ची भूमिका घेऊन होते.सरकारला डोकेदुखी न होता जनआंदोलनातून जंजिरा संघराज्यात आले पण हैदराबादचा निजाम  त्यासाठी तयार नव्हता.तिकडंही स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखाली जनआंदोलन सुरू होते.निजाम हे आंदोलन चिरडून टाकण्यासाठी प्रयत्न करीत राहिला.निजाम ऐकत नाही म्हटल्यावर वल्लभभाई पटेल यांनी हैदराबाद संस्थानात लष्कर धुसविले आणि चार दिवसात निजामाचा नक्षा उतरवून टाकला.तसं काही करण्याची वेळ सरकारवर जंजिऱ्यात आली नाही.हैदराबादच्या तुलनेत जंजिरा संस्थान छोटं म्हणजे जेमतेम तीन तालुक्यापुरतंच होतं.त्यामुळं या संस्थानची काळजी सरकारला वाटत नसावी.पण जंजिराचा nabab  काही अगळिक  केली असती आणि बदलत्या लोकभावनेची कदर केली नसती तर त्याला देखील पोलिस अ्रॅक्शनला तोंड द्यावं लागलं असतं हे नक्की.जंजिरा मुक्ती लढा जनतेने  लढला  पण या लढ्याचं महत्व सरकारला कळलं नाही.त्याची उपेक्षा केली गेली.या लढ्यातील सैनिकांना स्वातंत्र्यसैनिकांचा द र्जा देण्याचा मनाचा मोठेपणाही सरकारनं दाखविला नाही.31 जानेवारी हा जंजिरा मुक्ती दिन आहे.मात्र या दिवसाचं स्मरण व्हावं असा कोणताही कार्यक्रम सरकारी पातळीवर साजरा केला जात नाही.त्याचं दुःख या लढ्यातील हयात सैनिकांना नक्तीच आहे.सरकार काही करत नाही म्हटल्यावर रायगडातील पत्रकारांनी 2010साली मुरूड येथे जंजिरा मुक्ती दिन मोठ्या प्रमाणात साजरा केला.या लढ्यातील हयात 12 स्वातंत्र्य सैनिकांचा सत्कार केला तेव्हा त्यातील अनेकांना आपले अश्रू आवरता आले नाहीत.आमची उपेक्षा झाल्याची खंत त्यातील बहुतेकांनी बोलून दाखविली.या संबंधिचा पत्र व्यवहार सरकार दरबारी केला गेला पण सरकार जंजिरा मुक्ती लढ्यास स्वातंत्र्य लढा समजायला तयार नाही.सरकारचा हा कृतघ्नपणाच म्हणावा लागेल.त्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींना पुढाकार घ्यावा लागेल.पण अडचण अशी आहे की,जिल्हयातील लोकप्रतिऩिधीही या विषयाबाबत मौन बाळगून असतात.हा विषय हाती धेतला तर आपल्या मुस्लिम मतावर परिणाम होईल याची साठ वर्षानंतरही त्यांंना भिती वाटते.त्यामुळंच मुरूडला जेव्हा पहिला मुक्ती दिन साजरा केला गेला तेव्हा गावात झेंडा वंदनाचा कार्यक्रम झाला या कार्यक्रमास मुरूडच्या नगराध्यक्षांना निमंंत्रण देऊऩही त्यांनी येण्याचं धाडस दाखविलं नाही. वा स्तव अस आहे की,जंजिरा मुक्ती लढा हा मुस्लिम विरोधी लढा नव्हताच.नानासाहेबंानी तेव्हाच ते जाहिर केले होते.पण आजही या सोनेरी लढ्याला धर्माच्या बंधनात बांधून त्याची उपेक्षा करणयचा कार्यक्रम सरकार इमाने-इतबारे राबवत आहे.याची खंत वाटल्याशिवाय राहित नाही.दृवातंत्र्य सैनिकांनी म्हसळा आणि श्रीवर्धऩ तर ताब्यात घेतलं होतं पण नबाबची राजधानी ज्या मुरूडमध्ये होती ते अजून ताब्यात येणं बाकी होतं.बऱ्या बोलानं नबाब स्वतंत्र भारतात सामिल झाला नाही तर खाडी आलांडून मुरूडकडं कूच करणयाची योजना होती.तत्पुर्वीच म्हसळा आणि श्रीवर्धनवरील विजयाच्या तारा स्वातंत्र्यसैनिकांनी भारताचे गृहमंत्री वल्लभभाई पटेल,मुंबईचे मुख्यमंत्री बाळासाहेब खेर,तसेच मुरूडच्या नबाबाला पाठविल्या.”म्हसळा,श्रीवर्धन सर,उध्या स्वारी मुरूड जंजिऱ्यावर “असा तारांमधील आशय होता.नानासाहेबांची तार पाहून गर्भगळीत झालेला मुरूडचा नबाब31 जानेवारी 1948 रोजी मुंबईला गेला.तिथं त्यांनी मुबईचे मुख्यमंत्री बाळासाहेबांची भेट घेतली.आपण सामिलनाम्यावर स्वाक्षरी करायला तयार आहोत मुरूडवरील स्वारी थांबवा अशी विनंती नबाबानं मुख्यमंत्र्यांकडं केली.बाळासाहेब खेरांनी सामिलनाम्याचा कागद समोर ठेवला.निजामानं त्यावर स्वाक्षरी केली.कोणताही रक्तपात न होता लोकलढा यशस्वी झाला.मुरूड संस्थान इतिहास जमा झालं .जंजिऱ्यावर तिरंगा डोलानं फडकायला लागला.भारतीय संधराज्यात आणखी एक संस्थान विलीन झालं.त्यासाठी सरकारला काहीच करावं लागलं नाही.,संस्थानचं अस्तित्व संपल्यावर पुढं 3-4 दिवस नानासाहैब संस्थानचे पंतप्रधान म्हणून काम पाहिलं.सस्थानाच्या हद्दीत शांतता प्रस्थापित करण्याचं काम त्यंानी केलं.संस्थान विरोधी लढ्याच्या निमित्तानं हिंदू-मुस्लिम जातीय दंगे भडकतील अशी भिती व्यक्त केली जात होती. त्यामुळं सर्वत्र कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता.सुदैवानं तसं काही झालं नाही.सारी प्रक्रिया निर्विध्न पार पडली.नानासाहेबांनी पाच दिवसांनी आपली पंतप्रधानकीची वस्त्र 5 फेब्रूवारी 1948 रोजी तत्कालिन कलेक्टर झुबेरी यांच्याकडं सोपविली.नाना यशस्वी होऊन आपल्या गावी महाडला परतले.पैशाचाही चोख हिशोब दिला गेला.एक पैशाही इकडच्या तिकडं झाला नाही.

पत्रकार संरक्षण कायद्याच्या मागणीसाठी राज्यातील पत्रकार आक्रमक होणार

0
पत्रकार संरक्षण कायदा,पत्रकार पेन्शनसह पत्रकारांच्या दहा मागण्या
17 फेब्रुवारी रोजी राज्यातीलडीआयआो
 कार्यालयाांना पत्रकार घेराव घालणार
महाराष्ट्रात पत्रकारांवरील वाढते हल्ले आणि पत्रकार संरक्षण कायदा करण्यास सरकार करीत असलेली टाळाटाळ याचा निषेध कऱण्यासाठी आणि पत्रकारांच्या अन्य मागण्यांकडं सरकार आणि समाजाचं लक्ष वेधण्यासाठी महाराष्टातील पत्रकार येत्या 17 फेब्रुवारी 2014 रोजी जिल्हयाच्या ठिकाणी असलेल्या सर्व जिल्हा माहिती अधिकारी कार्यालयांना घेराव करतील.या लढ्यात राज्यातील पत्रकार  आणि पत्रकारांच्या विविध संघटनांनी सहभागी व्हावं असं आवाहन पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे निमंत्रक एस.एम.देशमुख यांनी एका प्रसिध्दी पत्रकाव्दारे केलं आहे.
 महाराष्ट्रात गेल्या वर्षी 73 पत्रकारांवर हल्ले झाले,2 पत्रकारांचे खून झाले,एका महिला पत्रकारावर बलात्कार झाला,चार दैनिकांच्या कार्यालयावर हल्ले झाले,नोकरी गमवावी लागल्याने चार पत्रकारांवर आत्महत्या करण्याची वेळ आली.ही सारी आखडेवारी राज्यातील पत्रकारिता भितीच्या सावटाखाली काम करते आहे हे दाखविणारी आहे.हे सारं थांबवायचं असेल तर राज्यात पत्रकार संरक्षण कायदा झाला पाहिजे ही मागणी घेऊन पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती गेली चार वर्षे सनदशीर मार्गाने आंदोलन करीत आहे.मात्र वृत्तपत्र स्वातंत्र्यांसाठी कटीबध्द असल्याचे ग्वाही देणारे सरकार पत्रकारांना राज्यात निर्धेोक काम करता येईल असे वातावरण तयार कऱण्यास उदासिन असल्याचे दिसते आहे.राज्यातील जिल्हा माहिती कार्यालयांना घेराव घालून पत्रकार आता याबाबातचा आपला संताप व्यक्त कऱणार आहेत.याबाबतची माहिती पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीने सरकारला कळविली आहे.
सरकारला पाठविलेल्या निवेदनात समितीने संरक्षण कायद्याशिवाय ज्येष्ठ पत्रकारांना दरमहा दहा हजार रूपये पेन्शन मिळाली पाहिजे,अधिस्वीकृती समितीचे पुनर्गठन त्वरीत झाले पाहिजे,राज्यातील पत्रकारांसाठी विमा योजना सुरू केली पाहिजे,शंकरराव चव्हाण पत्रकार कल्याण निधीतून पत्रकारांना दिल्या जाणाऱ्या मदतीचे निकष बदलून त्यात ज्यांच्याकडं अधिस्वीकृती नाही अशा गरजू पत्रकारांनाही मदत देण्याची तरतूद केली गेली पाहिजे,.साप्ताहिकं आणि जिल्हास्तरीय दैनिकं टिकली पाहिजेत यासाठी सरकारने या वृत्तपत्रांना तातडीने जाहिरात दर वाढ लागू केली पाहिजे,टीव्ही आणि मुद्रीत माध्यमातील पत्रकारांना नोकरीत कायद्यानं सरक्षण मिळालं पाहिजे,तालुका स्तरावर पत्रकार भवनासाठी जागा आणि निधी मिळाला पाहिजे,पत्रकार वसाहतीचे प्रश्न मार्गी लावले गेले पाहिजेत,प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाच्या धर्तीवर राज्यात स्टेट प्रेस कौन्सिल स्थापन केली गेली पाहिजे,राज्यात पत्रकारितेच्या अभ्यासक्रम एका छत्राखाली आणण्यासाठी स्वतंत्र पत्रकारिता विध्यापीठ स्थापन केले गेले पाहिजे आदि मागण्या करण्यात आलेल्या आहेत.
यासर्व मागण्यांची पुर्तता कऱावी अशी पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीची मागणी आहे आणि त्यासाठीच हे आंदोलन असल्याचे पत्रकात नमुद कऱण्यात आलं आहे.
17 फेब्रुवारी रोजी राज्यातील पत्रकार आपल्या जिल्हयातील जिल्हा माहिती कार्यालयात जमतील,तेथील दैनिक कामकाज बंद पाडतील,धोषणा दिल्या जातील आणि तीव्र स्वरूपाची निदर्शने कऱण्यात येतील असेही समितीने स्पष्ट केले आहे.या राज्यव्यापी आंदोलनात सर्वांनी सहभागी होण्याचे आवाहन समितीच्यावतीनं कऱण्यात आलं आहे
.अण्णा हजारेंना भेटणार
राज्यातील पत्रकारांवरील वाढते हल्ले आणि ते रोखण्यासाठी सरकारची उदासिनता याबाबतची माहिती पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीच्यावतीनं अण्णा हजारे यांना दिली जाणार आहे.तसेच 17 फेब्रुवारीच्या आंदोलनास अण्णा हजारे यांचा पाठिंबा मिळावा यासाठी एक शिष्टमंडळ राळेगणसिध्दी येथे अण्णा हजारे यांची भेट घेणार असल्याची माहिती समितीच्या प्रसिध्दी पत्रकात देण्यात आली आहे.

माहित आहे? भाई कोतवाल कोण होते ?

0

भारताच्या स्वातंत्र्यासाठी ज्या भारतपूत्रांनी बलिदान केले त्यात रायगड जिल्हयातील  वीर भाई कोतवाल यांचा उल्लेख करावाच लागेल.दुर्दैवाने स्वातंत्र्योत्तर काळात अनेक वीरांची उपेक्षा झाली त्यात भाई कोतवाल यांचाही समावेश आहे.भाई कोतवाल यांची उद्या 2 जानेवारी रोजी पुण्यतिथी आहे.या दिवशी कोणताही शासकीय कार्यक्रम होत नाही.रायगड प्रेस क्लबने माथेरान-नेरळ रस्तायव भाई कोतवाल यांचे स्मारक उभारले आहे आणि दर वर्षी दोन जानेवारीला येेथे अभिवादन कार्यक्रम केला जातो.शि.म.परांजपे कोण हे महाडच्या नव्या पिढीला माहित नसल्याचा अत्यंत विदारक अनुभव मला आला.या पार्श्वभूमीवर भाई कोतवालांची ओळक नव्या पिढीला व्हावी यासाठी भाईचे छायाचित्र असलेले एक कॅलेंडर कर्जत प्रेस क्लब उद्या प्रसिध्द करीत आहे.कर्जथ प्रेस क्लबच्या सर्व पदाधिकाऱ्यांना मनःफूर्वक धन्यवाद.तसेच उद्याच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं भाई कोतवाल यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन

हुतात्मा भाई कोतवाल-मॅन ऑफ दी पीपल

कतृत्व,विद्वत्तता आणि शोर्याचे वरदान रायगडला लाभलेले आहे.गगनाला गवसणी घालणारे अनेक महापुरूष रायगडने देशाला दिले.दुर्दैवानं स्वातंत्र्योत्तर कालखंडात रायगडच्या सर्वच नररत्नांना ङ्ग न्यायङ्घ मिळालाच असं नाही.व़िठ्ठल लक्ष्मण त था भाई कोतवाल असेच उपेक्षित स्वातंत्र्यवीरांपैकी एक.अफाट बुध्दीमत्ता,अचाट कर्तुत्व,पराकोटीचे मातृप्रेम,कमालीचे संघटन कौशल्य लाभलेल्या भाई कोतवालांचा जन्म निसर्गरम्य माथेरानमध्ये 1 डिसेंबर 1912 रोजी एका गरीब कुटुंबात झाला.जेमतेम 31 वर्षांचे आय़ुष्य लाभलेल्या हुतात्मा कोतवाल यांनी आयुष्याचा प्रत्येक क्षण राष्ट्राला समर्पित केला.पुण्यात शिक्षण घेताना शि.म.परांजपे यांच्या काळमधील लेखांचा खोल परिणाम त्यांच्या मनावर झाला.वि.दा.सावरकरांचे 1857चे स्वातंत्र्य समर, तसेच जोसेफ मॅझिनी,गॅरी बोल्डी यांच्या पुस्तकांनी त्यांच्या मनातील स्वातंत्र्याच्या उर्मी जागृत केल्या.त्यामुळं शिक्षण पूर्ण होताच त्यांनी स्वातंत्र्य लढ्यात उडी घेतली.1942च्या चळवळीत भाई कोतवाल,हिराजी पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी इंग्रज सरकारला अक्षऱशः  सळो की पळो करून सोडलं होतें. त्यांचा ङ्गआझाद दस्ताङ्घ रेल्वेचे रूळ उखडून टाक ायचा, विजेच्या तारा तोडायचा अन्य घातपाती कारवाई करून  जंगलात पसार व्हायचा. या गनिमीकाव्यामुळं  सरकार त्रस्त झालं  होतं  मात्र .जंग जंग पछाडल्यानंतरही भाई आणि त्यांच्या साथीदारांना पक़डण्यात  सरकारला यश येत नव्हतं.त्यामुळं भाई कोतवाल आणि गोमाजी रामा पाटील यांचा ठावठिकाणा सांगणाऱ्यास सरकारने पाच हजार रूपयांचे बक्षिस जाहीर केले होते.अखेर पैश्याच्या लालसेनं घात केला.एका फितूरानं पोलिसांना भाईंचा जंगलातील ठावठिकाणा तपशीलवार सांगितला. त्यानुसार हॉल नावाचा पोलिस अधिकारी शंभर बंदुकधारी पोलिसांचा ताफा घेऊन भल्या पहाटेच जंगलात घुसला.पोलिसांनी केलेल्या कारवाईत प्रारंभी हिराजी पाटील हुतात्मा झाले.त्यानंतर भाई कोतवाल यांच्यावर गोळ्यांचा वर्षाव केला गेला.  अ खेर सिध्दगडच्या पावनभूमीत रायगडचा हा सुपूत्र हुतात्मा झाला.तो दिवस होता 2 जानेवारी 1943 चा.
– मुंबई सरकारच्या गोपनीय अहवालात भाई कोतवालांचा उल्लेख ङ्ग मॅन ऑफ दी पीपलङ्घ असा केला गेला आहे.भाई हुतात्मा कोतवाल रायगडचे सुपूत्र आहेत याचा सार्थ अभिमान आम्हाला आहे.तरूणपणीच देशासाठी सर्वस्वाचं बलिदान कऱणाऱ्या भाई कोतवालांचं भव्य स्मारक रायगडात व्हावं ही रायगडवासियांची मागणी आहे.

POPULAR POSTS

error: Content is protected !!