भाषणात ‘बातमीमूल्य’ होते!

0
739

‘प्रसारभारती’ने हे भाषण प्रसारित करण्याचा निर्णय स्वतःच घेतलेला होता कारण, त्यात बातमीमूल्य होते म्हणून. खासगी चॅनल्सही ते कव्हर करतात त्यामुळे दूरदर्शनने सरसंघचालकांचे भाषण प्रसारित केले म्हणून आक्षेप घेण्याचे कारण नाही. पूर्वीच्या सरकारने बंधने घातल्याने यापूर्वी सरसंघचालकांचे भाषण दाखवले जात नव्हते, असे सांगत माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दूरदर्शनच्या कृतीचे समर्थन केले. काँग्रेस आणि अन्य पक्षाच्या नेत्यांची भाषणे दूरदर्शनवर दाखवली जातात तेव्हा कोणी का बोलत नाही, असा युक्तिवादही त्यांनी केला.

हा राज्यसत्तेचा बहुसंख्यावाद आहे. संघ ही जातीयवादी हिंदू संघटना असून, मशिदीतील इमामांचे आणि चर्चमधील पाद्रींचे भाषणही आता दूरदर्शनवर प्रसारित करायचे का?

– रामचंद्र गुहा, नामवंत इतिहास अभ्यासक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here