केवळ भक्तांच्या तणावमुक्तीसाठी …
निरव महोदयांनी तमाम भक्त मंडळींची कमालीची गोची करून टाकलीय. विरोधकांच्या टीकेला तोंड कसं द्यावं हेच .त्यांना उमगणास झालंय .त्यामुळं हे प्रकरण 2011 चं आहे हीच टेप ते वारंवार वाजवत आहेत , मात्र तेवढ्यानं विरोधकांचं समाधान होत नाही.2014 नंतर तुम्ही काय दिवे लावले ? असा प्रश्न विरोधक विचारतात उत्तर नसलेले प्रश्न आले की मग भक्त एकेरीवर येऊन शिविगाळ करतात.प्रश्न विचारणारांना मनोरूग्ण म्हणतात.काविळ झाल्याचा त्यांना वास येतो.भक्तांची चाललेली ही घालमेल पहावत नाही.मोदीसर .बारावीच्या मुलांसाठी तणावमुक्ती क्लास घेतात पण बिचार्या भक्तांसाठी असं काहीच करीत नाहीत.सारे भक्त माझे चांगले मित्र आहेत.त्यांना मदत करणं माझं कर्तव्य आहे.त्यामुळं त्यांना तणावमुक्त करणारी एक बातमी देतोय.( पत्रकार आहे..बातमीशिवाय मी देऊ तरी काय शकतो म्हणा,,) ही बातमी नवी नाही पण ती वाचून मंडळी नक्कीच खूष होईल. देशात गाजलेले बारा मोठे घोटाळे त्यांच्यासाठी सादर करतोय.यातील बहुतेक घोटाळे कॉग्रेसच्या काळात झालेले आहेत.’एवढे घोटाळे कॉग्रेसच्या काळात झालेले आहेत आमच्या काळात एखादा मल्ल्या किंवा एखादा निरव देशाला चुना लावून पळाला तर तुम्ही त्याचं किती भांडवल करता ? असं म्हणून विरोधकांची बोलती बंद करता येऊ शकते.”यातून भक्तांची तणावमुक्ती होऊ शकेल असं वाटतं.मी नकारात्मक पोस्ट टाकतो अशी भक्तांची नेहमी तक्रार असते.ही सकारात्मक पोस्ट केवळ त्यांचा बीपी वाढू नये आणि त्यांनी शिविगाळ न करता चर्चा करावी यासाठी आहे.’बिचारे भक्त’ ही पोस्ट वाचून तणावमुक्त होतील याची मला खात्री आहे.
देशातील 12 मोठे घोटाळे
1) कोळसा खाण वाटप घोटाळा .. 1,86,000 कोटी
2) टू जी स्पेक्ट्रम घोटाळा 1,76,000 कोटी
3) वक्फ बोर्ड जमिन घोटाळा 1,50,000 कोटी
4) कॅामनवेल्थ गेम्स 70,000 कोटी
5) तेलगीचा घोटाळा 20,000 कोटी
6) सत्यम घोटाळा 14,000 कोटी
7) बोफोर्स घोटाळा 100 ते 200 कोटी
8) चारा घोटाळा 1,000 कोटी
9) हवाला घोटाळा 100 कोटी
10) हर्षद मेहता केतन पारेख स्टॉक मार्केट घोटाळा 5000 कोटी
11) विजय मल्या 9,000 कोटी
12) निरव मोदी 13,000 कोटी