पत्रकार शंकरराव साठे यांचे निधन

0
733

सोलापूर जिल्ह्य़ातील ज्येष्ठ पत्रकार शंकरराव विठ्ठलराव साठे (८०) यांचे सोमवारी दुपारी अडीचच्या सुमारास वृद्धापकाळाने निधन झाले. पाच दशके पत्रकारितेत कार्यरत राहताना साठे यांनी माहिती अधिकार चळवळीची मुळे रुजविली व त्या बळावर भ्रष्टाचाराची काही प्रकरणे उजेडात आणली होती. मोहोळ तालुक्यातील भोयरे येथे सायंकाळी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
उजनी धरणात पुणे जिल्ह्य़ातून पाणी सोडण्याची मागणी करीत शंकरराव साठे यांनी या मुद्यावर मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती.त्याची दखल घेऊन उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार शासनाला पुणे जिल्ह्य़ातील भामा आसखेड धरणातून उजनी धरणात दोन टीएमसी पाणी सोडणे भाग पडले होते. त्या वेळी साठे हे प्रकाशात आले होते. ज्येष्ठ दिवंगत संपादक रंगा वैद्य यांच्या मार्गदर्शनाखाली सुमारे पाच दशके पत्रकारितेची सेवा करणारे साठे यांनी नंतर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या भ्रष्टाचारविरोधी जनआंदोलनात सहभागी होऊन माहिती अधिकार कायद्याचा उपयोग करून काही भ्रष्टाचाराची प्रकरणे उजेडात आणली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here