प्रेस कौन्सिल आॅफ इंडिया म्हणजे दात आणि नखं नसलेला वाघ आहे हे वास्तव काल केंद्र सरकारने मान्य केले.राज्यसभेत माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात प्रेस कौन्सिलबद्दलचं हे मत व्यक्त केलंय.तेलंगणमध्ये दोन वाहिन्यावंर घालण्यात आलेल्या बंदीचा विषय राज्यसभेत उपस्थित झाला तेव्हा जावडेकर म्हणाले,प्रसार माध्यमाना दडपविणयाचे प्रकार दुदौवीर् आणि निषेधाहर् असून माध्यमांचे स्वातंत्र्य अबाधित राखण्यास सरकार कटीबध्द असल्याचे त्यांनी सांगितले.याच वेळेस जावडेकर माध्यमांना उपदेश करायला विसरले नाहीत.ते म्हणाले,माध्यमांनी स्वातंत्र्य आणि जबाबदारी याची सीमारेषा जपणे आवश्यक आहे.माध्यमांनी स्वतःसाठी आचारसंहिता तयार केली तर वाद सरकारच्या दारी येणारच नाहीत.
माध्यमांवरील हल्ले तसेच पत्रकार पेन्शन योजनेचा विषय चालू आठवड्यात चचेर्ला येईल अशी अपेक्षा होती पण त्यावर चचार् झालेली नाही.