महाराष्ट्रातील तमाम पत्रकारांचा मी ऋुणी आहे.काल दोन्ही सभागृहात पत्रकार संरक्षण कायदा संमत झाल्यानंतर राज्यातील पत्रकार मित्रांनी माझ्यावर शुभेच्छा आणि अभिनंंदनाचा अक्षरशः वर्षाव केला.थेट फोन करून,एसएमएसव्दारे आणि व्हॉटसअॅपच्या माध्यमातून हजारो मित्रांनी माझे अभिनंदन केले .आपले सर्वांचे मनापासून आभार.कायद्याचे श्रेय कुणाला,कोणत्या संघटनेला घ्यायचे ते त्यांनी खुशाल घ्यावे.मला तुमचं सर्वाचं प्रेम आणि विश्वास हवा आहे.तो मला मिळतोय ,त्या अर्थानं मी भाग्यवान आहे.हेच प्रेम कायम असू द्यावं हीच नम्र विनंती.
परत सर्वाचे आभार.
तुमचा
एस. एम