अरविंंंद केजरीवाल आज मिडियावर आरोप करीत आहेत.मिडियाला तुरूंगात डांबण्याची धमकी देत आहेत.मिडिया विकला गेलला आहे असा आरोप करीत देशातील माध्यमांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करीत आहेत.अरविंद केजरीवाल असे पिसाळल्यासारखे क ा करीत आहे तर त्याचा दुटप्पीपणा माध्यमं जनतेसमोर आणत आङेत.मी भाजप किंवा कॉग्रसचं समर्थन घेणार नाही,मी सेक्युरिटी घेणार नाही, सरकारी बंगला घेणार नाही,लाल दिवा वापरणार नाही अशी अनेक विधानं त्यांनी केली आणि नंतर त्यांना त्याचा सविस्तर विसर पडला.त्यांची ही डबलस्टॅन्डर्ड वृती मिडियानं जनतेसमोर मांडली त्यामुळे ते मिडियावर चवताळले आहेत.आज रात्री इंडिया टीव्हीवर रजत शर्मा यांनी केजरीवाल यांचा असली चेङरा जनतेसमोर आणला या कार्यक्रमाची व्हिडिओ मुद्दाम येथे देत आहे.ज्यांना केजरीवाल यांचा पुळका आलेला आहे त्यांनी हा व्हिडीओ मुद्दाम पाहावा म्हणजे त्यांना कळेल की,व्यवस्थापरिवर्तन आणि आम आदमीची भाषा बोलणारा हा माणून आम राजकारण्यांसारखाच आहे.