सोशल मिडियाचं आव्हान इलेक्टॉनिक आणि प्रिन्ट
मिडियाला पेलवणं आता अवघड झालंय का
सोशल मिडायाचा आज सर्वत्र बोलबाला आहे.जगाच्या एका कोपर्यात घडलेली बातमी दुसर्या क्षणात आपल्या हातात येत असल्यानं सकाळची वृत्तपत्रे अथवा वाहिन्यांवच्या बातम्या पहात बसण्याची कोणाला आवश्यकता वाटत नाही.आणखी पन्नास वर्षे प्रिन्ट मिडियाला मरण नाही असे भलेही बोलले जात असले आणि वाचक संख्येत वाढ झाली असे दावे केले जात असले तरी वास्तव वेगळे आहे.त्यामुळं जगभरातील मुद्रित माध्यमांच्या आवृत्या फटाफट बंद होत आहेत,कोणी पानांची संख्या कमी करीत आहेत.इलेक्टॉनिक माध्यमांचंही आकर्षण आता पुर्वी सारखं राहिलेलं नाही.सोशल मिडियाचं हे आव्हान प्रिन्ट आणि इलेक्टॉनिक या परंपरागत मिडियाला आता पेलवत नाही काय असा प्रश्न उपस्थित व्हायला लागला आहे.
याच महत्वाच्या विषयावरचा परिसंवाद
मराठी पत्रकार परिषदेच्या नांदेड अधिवेशनात होत आहे.
परिसंवादात भाग घेत आहेत..
प्रकाश अकोलकर ( ज्येष्ठ पत्रकार,मुंबई )
आशिष जाधव ( संपादक जय महाराष्ट्र )
सुभाष शिर्के ( संपादक,न्यूज नेशन,मुंबई )
हलिमा कुरेशी ( बीबीसी न्यूज मराठी,पुणे )
श्रीमंत माने ( संपादक सकाळ नाशिक )
डॉ.दीपक शिंदे ( विभाग प्रमुख वृत्तपत्र विभाग स्वारातीमवी)
दिनांक १७ ऑगस्ट १९ दुपारी 2 वाजता