शेतकऱ्यांवर पोलिसांचा लाठीमार

0
698

रायगड जिल्हयातील वडखळ नजिक असलेल्या जे एस डब्ल्यू इस्पात कंपनीच्या विरोधात आंदोलन कऱणाऱ्या शेतकरी आणि मच्छिमारांवर पोलिसांनी केलेल्या लाठीमारात अनेक जण जखमी झाले आहेत..यावेळी झालेल्या धुमश्चक ्रीत एक पोलिस कर्मचारी देखील जखमी झाल्याचे वडखळ पोलिसांनी आकाशवाणीला सांगितले.या प्रकरणी पोलिसांनी 27 जणांना अटक करून सायंकाळी पेणच्या न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने एक दिवसाची पोलिस कोठडी दिली आहे.या घटनेने परिसरात तणावाचे वातावरण आहे.

इस्पात कंपनीच्या मोठ्या बार्जेस खाडीतून ये-जा करीत असतात.त्यामुळे खारे पाणी शेतीत घुसून मोठे नुकसान होत असल्याची शेतकऱ्यांची तक्रार आहे.कंपनीने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी शेतकऱ्यांची मागणी आहे त्यासाठीच आज कंपनी गेट समोर आंदोलन कऱण्यात आले होते.त्यावेळी पोलिस आणि आंदोलकंादरम्यान बाचाबाची झाल्यानंतर पोलिसांनी लाठीमार सुरू केला.त्यात मोठया प्रमाणात आंदोलक जखमी झाले आहेत.शांततेच्या मार्गाने आंदोलन कऱणा़ऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार करणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यावर कारवाई कऱण्याची मागणी शिवसेनेने केली आङे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here