वागळे-खांडेकर यांच्यावरील हक्कभंग मागे घेण्याची मागणी

0
672

आयबीएन-लोकमतचे संपादक निखिल वागळे आणि एबीपी माझाचे संपादक राजीव खांडेकर यांच्यावरील हक्कभंग ठराव मागे घ्यावा अशी मागणी शेकापचे आमदार जयंत पाटील यांनी आज विधान परिषदेत केली आहे.सुदैव आपलं,क ुठल्यातरी राजकीय पक्षाच्या आमदाराला पत्रकारांची बाजू घेण्याची सुबुध्दी सुचली.सभापतींनी जयंत पाटील यांची मागणी मान्य केली नसली तरी कोणी तरी बोलले हे काही कमी नाही.जयंत पाटील यांना धन्यवाद दिले पाहिजेत.

राज्यातील तमाम पत्रकारांची देखील हीच मागणी आहे.हक्कभंग मागे घ्यावा.कोणत्याही पध्दतीनं मग तो हक्कभंग असो,पत्रकारावर हल्ले करून असो किंवा पत्रकारांच्या नोकऱ्यांवर गदा आणून असो पत्रकाारंचा आवाज बंद कऱण्याचा कोणताही प्रय़त्न आम्हाला मान्य नाही.तो राज्यातील पत्रकार चालूही देणार नाहीत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here