देशासाठी “मेक इन इंडिया” राज्यासाठी “मेक इन महाराष्ट्र” तर ग्रामीण भागाचा विकास करण्यासाठी “मेक इन व्हिलेज” ही संकल्पना राबविण्याचा मानस असून राज्यातील ग्रामीण भागाला विकसीत करण्यासाठी तेथील उद्योगांना संधी देण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे, असे प्रतिपादन ग्रामविकास मंत्री श्रीमती पंकजा मुंडे यांनी केले.
अलिबाग तालुकयातील किहिम येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘मांडवा-किहिम फेस्टिव्हल’चे उद्घाटन ग्रामविकास मंत्री श्रीमती पंकजा मुंडे यांच्या हस्ते आज करण्यात आले. त्यावेळी त्या बोलत होत्या.
महिला व बाल कल्याण विभाग तसेच सरकारच्या ग्रामीण विकास माध्यमातून महिलांचा बचत गट जास्तीत जास्त सक्षम करुन ग्रामीण उद्योगाला प्राधान्य देण्याचा प्रयत्न असल्याचेही त्यांनी आपल्या उद्घाटनपर भाषणात सांगितले.
कार्यक्रमापूर्वी जिल्हा परिषदेच्या महिला व बाल कल्याण विभागातर्फे तयार करण्यात आलेल्या पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. याप्रसंगी आमदार प्रशांत ठाकूर, उपस्थित होते.