निवडणूक प्रक्रिया संपल्यावरच प्रसार भारतीच्या अध्यक्षाची नियुक्ती केली जावी अशी सूचना निवडणूक आय़ोगानं माहिती आणि जनसंपर्क मंत्र्यांना केली आहे.प्रसार भारतीचे अध्यक्ष मृणाल पांडे यांचा कार्यकाल गेल्या महिन्यातच पूर्ण झाल्याने रिक्त झालेल्या जागेवर नवी नियुक्तीबाबत मंत्रालयाने निवडणूक आयोगाकडं परवानगी विचारणा केली होती.
प्रसार भारतीच्या अध्यक्षांची नियुक्ती एका समितीमार्फथ केली जाते.या समितीच प्रमुख भारताचे उपराष्ट्रपती असतात.फिल्म प्रमाणन अपीली न्यायाधिकरण च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नियुक्तयाही निवडणूक प्रक्रियेनंतरच कराव्यात असेही निवडणूक आयोगाने सागंतिले आहे.