कोथरूड, दि. 3 (प्रतिनिधी) – पत्रकार सागर जगताप यांच्या मातोश्री जयश्री रविंद्र जगताप (वय 50) यांचे अल्पशा आजाराने दु:खद निधन झाले. त्यांचा निधनाने वारजे परिसरात शोककळा पसरली. आज सकाळी वैकुंठ स्मशानभुमी येथे त्यांचावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी राजकीय, सामाजिक, शैक्षणिक यासह पत्रकारिता क्षेत्रातील आणि शासकीय अधिकारी उपस्थित होते. त्यांच्या पश्चात पती, एक मुलगा सागर, मुलगी सरीता, सुन प्रिया असा परिवार आहे. राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे जिल्हा अध्यक्ष रविंद्र जगताप यांच्या त्या पत्नी होत्या.