कायद्याची कठोरपणे अंमलबजावणी होत नसल्याने महाराष्ट्रात पत्रकारांवरील हल्ल्यांचे प्रमाण पुन्हा वाढले :एस.एम.देशमुख

मुंबई :महाराष्ट्रात पत्रकार संरक्षण कायद्याची कठोरपणे अंमलबजावणी होत नसल्याने राज्यातील पत्रकारांवर पुन्हा एकदा चिंता वाटावी अशा प़माणात हल्ले वाढल्याचा आरोप पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे निमंत्रक एस.एम.देशमुख यांनी केला आहे..
उदया जागतिक स्तरावर पत्रकार हल्ला विरोधी दिवस पाळला जात आहे.. त्याच्या पुर्वसंधेला माध्यमांशी संवाद साधताना एस.एम.देशमुख यांनी हा आरोप केला..
एस एम देशमूख म्हणाले, महाराष्ट्रात पत्रकारांवर सातत्याने हल्ले होत होते.. त्याविरोधात पत्रकारांच्या सर्व संघटनांनी एकत्र येत पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीची स्थापना केली होती.. समितीच्या वतीने सतत बारा वर्षे, संघर्ष, आंदोलनं केल्यानंतर ७ एप़िल २०१७ रोजी महाराष्ट्र सरकारने पत्रकार संरक्षण कायद्याचे एक विधेयक विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहात मांडले.. ते एकमताने संमत झाले.. त्यावर २८ नोव्हेंबर २०१९ रोजी राष्ट्रपतींची स्वाक्षरी झाली आणि ८ डिसेंबर २०१९ रोजी महाराष्ट्रात पत्रकार संरक्षण कायदा लागू झाला.. कायदा झाल्यानंतर पहिल्या सहामाहीत पत्रकारांवरील हल्ल्यांचे प़माण घटले होते.. मात्र पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हेच दाखल होत नाहीत असे वास्तव समोर आल्यानंतर राज्यात पत्रकारांवरील हल्ल्याचे प़माण पुन्हा वाढले आहे.. राज्यात सध्या १० दिवसाला एका पत्रकारावर हल्ला होत आहे..
एस.एम.देशमुख म्हणाले, पत्रकारांना कायदेशीर संरक्षण देणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले आणि एकमेव राज्य आहे.. त्याचे नक्कीच कौतूक असले तरी हा कायदा केवळ कागदोपत्रीच आहे, त्याची अंमलबजावणी होत नसल्याने कायद्याचा धाक उरला नाही . या कायद्याखाली गुन्हे दाखल करून घेण्यास पोलीस टाळाटाळ करतात अनेक ठिकाणी तर असा काही कायदा आहे हेच पोलिसांना माहिती नसल्याचा आरोपही देशमुख यांनी केला आहे.. मात्र काही ठिकाणी पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल झालेले आहेत हे देखील देशमुख यांनी मान्य केले..
पत्रकार संरक्षण कायद्याची कठोरपणे अंमलबजावणी करावी या मागणीची निवेदन वारंवार मुख्यमंत्र्यांना पाठविली पण त्याचा उपयोग होत नाही.. त्यामुळे नुकतीच आम्ही गृहमंत्री दिलीप वळसे पाटील पाटील यांची भेट घेऊन पत्रकारांवरील वाढत्या हललयाबददल चिंता व्यक्त करीत कायद्याची कठोर अंमलबजावणी करण्याचे आदेश पोलिसांना द्यावेत अशी त्यांच्याकडे मागणी केल्याचे देशमुख यांनी सांगितले..
पत्रकार संरक्षण कायद्यानुसार पत्रकारांवरील हल्ला हा अजामिनपात्र गुन्हा असून गुन्हा सिध्द झाल्यास हललेखोरांना ३ वर्षाच्या शिक्षेची आणि पन्नास हजार रूपये दंडाची तरतूद करण्यात आलेली आहे.. तसेच पत्रकार किंवा माध्यमाच्या कार्यालयाचे जेवढे नुकसान झाले आहे तेवढे नुकसान हल्वोखोरांकडून वसूल करण्याची तरतूद देखील या कायद्यात केलेली आहे..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here