नगर मनपाची अरेरावी..

0
509

पालकमंत्र्यांना प्रश्न विचारल्याचा राग
पत्रकाराला नगर मनपाची नोटीस
अरेरावीचा पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीतर्फे निषेध

अहमदनगर

लसीकरणातील गोंधळासंबंधी अहमदनगरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना पत्रकार परिषदेत प्रश्न विचारणाऱ्या पत्रकाराला महापालिकेने नोटीस बजावली आहे. या प्रश्नासंबंधी तीन दिवसांत महापालिकेकडे पुराव्यांसह खुलासा करण्यास सांगण्यात आले आहे. महापालिकेतर्फे आरोग्य अधिकाऱ्याने ही नोटीस पाठविली आहे.नगर मनपाच्या या दांडगाईचा आणि पत्रकारांचा आवाज बंद करण्याच्या प़यत्नांचा पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती आणि मराठी पत्रकार परिषदेने निषेध केला असून मनपाने तातडीने नोटीस मागे घ्यावी अशी मागणी केली आहे.
महापालिकेत शिवसेना-राष्ट्रवादी यांची सत्ता आहे. मात्र, महापालिका प्रशासनाची ही द़डपशाही असून कारभार सुधारण्याऐवजी पत्रकारालाच नोटीस पाठविण्याच्या या तालिबानी वृत्तीचा निषेध करीत असल्याची प्रतिक्रिया शिवसेनेचे नगरसेवक बाळासाहेब बोराटे यांनी व्यक्त केली आहे.
स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी अहमदनगरला करोनासंबंधीच्या उपाययोजनांची आढावा बैठक घेतली होती. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली. यामध्ये लसीकरणासंबंधी सुरू असलेल्या गोंधळासंबंधीचे प्रश्नही होते. मनपाच्या लसीकरण केद्रांवर गोंधळ असून काही ठिकाणी कर्मचारी लस बाहेर विकत असल्यासंबंधी सामनाच्या वार्ताहराने प्रश्न विचारला होता. त्याला पालकमंत्री मुश्रीफ यांनी याची दखल घेतल्याचे सांगून प्रशासनाला गैरप्रकार होत असतील तर चौकशी करण्याच्या सूचना तेथेच दिल्या होत्या. असे प्रश्न पुन्हा पुन्हा येत असल्याबद्दल वरिष्ठ अधिकाऱ्यांनी यात लक्ष घालावे, असेही पालकमंत्र्यांनी सांगितले होते.

पालकमंत्र्यांची पाठ फिरल्यानंतर महापालिकेने वेगळीच भूमिका घेतली. महापालिकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी उलट प्रश्न विचारणाऱ्या पत्रकारालाच नोटीस पाठविली आहे. त्यांनी म्हटले आहे, करोनाची साथ नियंत्रणासाठी मार्च २०२० पासून मनपा प्रशासन व आरोग्य कर्मचारी सरकारच्या निर्देशानुसार उपाययोजना व आरोग्य विषयक सर्व सोयो सुविधा सातत्याने देत आहे. जानेवारी २०२१ पासून मनपा आरोग्य कर्मचारी लसीकरण मोहीम राबवित आहेत. आतापर्यंत एकूण १५०६४ कुप्यांद्वारे एकूण १५४०९५ नागरिकांचे लसीकरण करण्यात आलेले आहे. सरकारकडून लस अल्पप्रमाणात व अनियमीतपणे उपलब्ध होत असल्याने शहरातील नागरिकांना लसबाबत माहिती व्हावी यासाठी मनपा प्रशासनामार्फत लसीकरणासंदर्भात विविध प्रसार माध्यमे व समाज माध्यमांद्वारे दैनंदिन माहिती दिली जाते. तथापि, आपण पालकमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेमध्ये मनपाच्या लसीकरण केंद्रांमधून लस बाहेर विकली जाते, असा प्रश्न

पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीतर्फे निषेध

प़श्न विचारणे हा पत्रकारांचा अधिकार आहे, हा मुलभूत अधिकारच मान्य न करण्याची मनपाची भूमिका तालिबानी असून या प़वृत्तीची आम्ही तीव़ शब्दात निषेध करीत असल्याचे मत पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे निमंत्रक एस.एम.देशमुख यांनी व्यक्त केले आहे.. प़सिध्दीस दिलेल्या पत्रकात देशमुख यांनी म्हटले आहे की, प़श्न विचारलयाने त्रागा करण्यापेक्षा मनपाने आपला कारभार सुधारून कोठे लसीचा काळाबाजार झाला त्याची चौकशी करणे आवश्यक होते.. मात्र असे न करता पत्रकारालाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करण्याची मनपाची भूमिका आक्षेपार्ह आणि माध्यमांचा आवाज बंद करणारी आहे.. मनपाच्या अशा नोटिशीला आणि अरेरावीला आम्ही भीक घालणार नसल्याचे मत देशमुख यांनी व्यक्त केले असून पालकमंत्र्यांनी यामध्ये हस्तक्षेप करून नोटिस मागे घेण्याचे आदेश संबंधितांना द्यावेत अन्यथा राज्यातील पत्रकारांना रस्त्यावर उतरावे लागेल असा इशाराही देशमुख यांनी दिला आहे..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here