‘द क्विंट’ च्या कायाॅलयावर धाडी

0
860

नवी दिल्ली :विविध पध्दतीनं माध्यमांचा आवाज बंद करण्याचा प्रयत्न होतोय.. राज्यपालांच्या विरोधात बातमी दिल्यानं तामिळनाडूतील एका पत्रकारावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली.. ही घटना ताजी असतानाच आज ‘ द क्विंट’ या पोटॅल च्या नोयडा येथील कायाॅलयावर तसेच संपादक राघव बहल यांच्या निवासस्थानी आयकर विभागानं आज धाड टाकली. कर चुकविलयामुळे ही कारवाई केली गेली असं आयकर विभागाने म्हटले असले तरी आम्ही नियमित कर भरतो.. त्याची कागदपत्रे आमच्याकडे असल्याचं बहल यांचं म्हणणं आहे.. सरकारच्या विरोधात मेनस्ट्रीम मिडियानं मौन बाळगले असले तरी पोटॅलवर सरकार विरोधी बातम्या धडाक्यात दिल्या जात असल्याने आता पोटॅलला त्रास देण्याचा प्रयत्न केला जात आहे..
कॉगेंसनं या धाडीचा निषेध केला आहे.. माध्यमांचा आवाज बंद करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप राहूल गांधी यांनी केला आहे.. मिडियावर धाडी घालणे, छळ करणे, हल्ले करणे, आदि पध्दतीनं माध्यमांचा आवाज बंद करण्याचा प्रयत्न होत असल्याचं म्हणणं आहे..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here