संघर्ष एका तपाचा…

अर्थात अशी लढली गेली पत्रकार संरक्षण कायद्याची लढाई..

बारा  वर्षे झाली.पहिल्यांदा पत्रकार संरक्षण कायदा आणि पत्रकार पेन्शनची  मागणी केली त्याला.2005 मध्ये लढाई सुरू झाली. 25 डिसेंबर 2005 रोजी मराठी पत्रकार परिषदेच्या मुंबईत झालेल्या सर्वसाधारण सभेत हा विषय प्रथम मांडला गेला .  त्याला उत्तर देताना तत्कालिन गृहमंत्री आर.आर.पाटील यांनी ‘पत्रकार संरक्षण कायदा कऱणार’ असल्याचे तेथेच जाहीर केले.त्यानंतर गेली बारा वर्षे आम्हाला अशीच आश्‍वासनं मिळत गेली.मात्र कायद्याचा पाळणा हालत नव्हता .बारा वर्षाचा हा संघर्ष आमची सत्वपरीक्षा पाहणारा होता.आशा-निराशेच्या हिंदोळ्यावर चळवळ हेलकावे खात होती.’तुमच्या हयातीत तरी कायदा होणार नाही’ असं काही सूर व्यक्त होत होते  बोलत ,तर आपलेच काही ‘कायद्याची गरजच काय ‘? ची भाषा वापरत होते.मात्र आम्ही निराश झालो नाही,थकलो नाही.आमचा लढा चालूच ठेवला. चळवळीत सातत्य ठेवले.वेगवेगळी आंदोलनं सुरू असतानाच चर्चेची दारंही बंद केली नाहीत.आंदोलनं आणि चर्चा दोन्ही सुरू ठेवल्या.अनेकदा आश्‍वासनं मिळाली,पुढार्‍यांचे आत एक बाहेर एक हे स्वभावही अनुभवास आले.पुढार्‍यांच्या पाताळयंत्री उद्योगामुळे व्यक्तीगत आमचं मोठं नुकसानही झालं.मोठ्या पगाराच्या दोन नोकर्‍यांवर पाणी सोडावं लागलं.तरीही घाबरलो नाही,लाचार झालो नाही किंवा कुणापुढं हात पसरले नाही.कोणाला भीक घालण्याचं कारण नव्हतं,कारण निर्धार केला होता,’कायदा करायला सरकारला भाग पाडायचंच’.त्यामुळं गेली बारा वर्षे लढत राहिलो.घरचे आणि बाहेरचे मित्रही अनेकदा वेडयात काढायचे.चांगली नोकरी सोडून हे काय उद्योग करीत बसलात ? असे टोमणे ऐकावे लागायचे.आम्ही अशा कोणत्याही टिकेची पर्वा केली नाही.कारण पत्रकारांच्या व्यथा,त्यांची दुःख,त्यांच्या वेदना आम्ही अनुभवलेल्या होत्या.पत्रकारांच्या काही समस्या आहेत हेच समाज आजही मान्य करीत नाही,सरकार पत्रकारांच्या प्रश्‍नाबद्दल उदासिन आहे,मालकांना त्यांच्या प्रश्‍नांनी काही देणं घेणं नाही आणि पत्रकारांकडून खंडीभऱ अपेक्षा ठेवणारा समाज जेव्हा पत्रकारांना मदतीची गरज असते तेव्हा हात झटकून मोकळा होतो.आपल्यामधील पांढरपेशे,सुखवस्तू मंडळी ‘आम्हाला पत्रकार म्हणून घेण्याची लाज वाटते ‘अशी  भाषा वापरून पत्रकारांबद्दलचा नकारात्मक भाव वाढविण्याचं काम करीत होती.पत्रकारां मागचं हे गिर्‍हाण सोडवायचं तर  कुणाला तरी आपल्या घरावर तुळशीपत्र ठेवणं आवश्यक होतं.त्यासाठी आम्ही तयारी दर्शविली करिअरकडं दुर्लक्ष करीत,लेखनाकडं कानाडोळा करीत लढाई लढत राहिलो.

किरण नाईकांची खंबीर साथ होती आणि राज्यातील तमाम पत्रकार आमच्या पाठिशी होते. पत्रकारांनी दाखविलेला हा विश्‍वास,त्यांनी दिलेली साथ आणि त्यांनी आमच्याबद्दल दाखविलेला आपलेपणाच आम्हाला अनेक संकटावर मात करायला बळ देत गेला.मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आश्‍वासनाप्रमाणे उद्या जर कायदा झालाच तर त्याचं सारं श्रेय राज्यातील तमाम पत्रकारांना असणार आहे.कारण एक तप चळवळ चालविणं सोपं नव्हतं.आम्ही आवाहन  केलं आणि पत्रकार रस्त्यावर उतरले.असे अनेकदा घडले.’किती दिवस हा उद्योग करायचा ‘?असा उद्ववेग कोणीही व्यक्त केला नाही.’एस.एम.देशमुख लढताहेत म्हणजे कायदा होणारच’ हा विश्‍वास त्यामागे होता.

बारा वर्षांच्या अथक परिश्रमानंतर आता चळवळीला यश येताना दिसतंय. कायद्यासाठी वातावरण अनुकूल असलं तरी हे केवळ आश्‍वासन आहे,2005 पासून आपल्याला त्याची सवय असल्यानं प्रत्येक्ष कायदा झाल्याशिवाय विश्‍वास ठेवता येणार नाही.अर्थात उद्या काय व्हायचं ते होईल,मात्र ही लढाई आमच्यासाठी  रोमहर्षक नक्कीच होती,वेगवेगले अनुभव देणारी होती हे नक्की . 

बारा वर्षे आपण कसे लढतो याची माहिती देणारा हा घटनाक्रम जसा आठवला तसा येथे मांडला आहे.तो डोळ्याखालून घातलाच पाहिजे.

 

 25 डिसेंबर 2005 —  

मराठी पत्रकार परिषदेच्या मुंबई येथे झालेल्या कार्यक्रमात एस.एम.देशमुख यांनी  सर्वप्रथम पत्रकार संरक्षम कायदा कऱण्याची मागणी केली.गृहमंत्री आर.आर.पाटील यांनी  कायदा कऱण्याचं आश्‍वासन दिलं.

 9 फेब्रुवारी 2006 —

धुळे येथील आपला महाराष्ट्रच्या कार्यालयावर हल्ला

19 फेब्रुवारी 2006 — 

संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांचा नगर येथील लोकसत्ताच्या कार्यालयावर हल्ला

19 फेब्रुवारी 2006 

— पुणे लोकमतच्या कार्यालयात एका कवितेवरून गुंडांचा धुडगुस

26 फेब्रुवारी 2006 –

– झी-24तासच्या कार्यालयावर मुंबईत हल्ला

16 एप्रिल   2006 –

–  स्टार न्यूज मुंबईच्या कार्यालयावर हल्ला

22 मे  2007 —

पाटणचे पत्रकार जालंदर सत्रे यांच्यावर हल्ला

16 ऑगस्ट  2007 –

– आउटलुकच्या मुंबई येथील कार्यालयावर हल्ला

6 जून       2008 —   

ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर  यांच्या मुंबईतील घरावर हल्ला ( समुद्रातील   शिवस्मारकास   विरोध कऱणारा अग्रलेखाबद्दल )

 22 जानेवारी 2009– 

नवाकाळच्या मुंबईतील कार्यालयावर हल्ला

 24 ऑक्टोबर 2009 

— नाशिक येथील आयबीएन-लोकमतच्या दीप्ती राऊत यांच्यावर हल्ला

ऑक्टोबर     2009–

लातूर येथील महानग

20 नोव्हेंबर    2009–

मुंबईतील आयबीएन-लोकमत आणि आयबीएन-7च्या कार्यालयावर हल्ला

डिसेंबर       2009 –

–  पुण्यातील सकाळचे पत्रकार योगेश कुटे यांना बिल्डरकडून मारहाण

डिसेंबर       2009–

पत्रकारांची विधानभवन परिसरात निदर्शने.पत्रकार संरक्षण कायदा कऱण्याचे नागपूर  अधिवेशनात सरकारचे पुन्हा आश्‍वासन.मुख्यमंत्र्यांची भेट.सरकारी हल्ला विरोधी  समिती अपग्रेड करून मुख्यमंत्री अध्यक्ष होतील अशी घोषणा

जानेवारी     2010 

टाइम्स ऑफ इंडियाचे बीजू बी यांच्यावर महाडनजिक रेती माफियांचा हल्ला

 13 जुलै      2010 –

अंबाजोगाई येथील पत्रकार दत्तात्रय अंबेकर यांच्यावर जीवघेणा हल्ला

 20 जुलै      2010 –

एस.एम.देशमुख,प्रफुल्ल मारपकवार,किरण नाईक यांनी मंत्रालयात मुख्यमंत्री अशोक चव्हाण,गृहमंत्री आर.आर.पाटील यांची भेट घेऊन अंबेकरवरील हल्ल्याची चौकशी   करण्याचं आणि कायदा करण्याची मागणी

 4 ऑगस्ट    2010 —

महाराष्ट्रातील पत्रकारांच्या सोळा संघटनांनी एकत्र येत पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती स्थापन केली.त्याचे निमंत्रक म्हणून एस.एम.देशमुख यांची एकमतानं निवड  केली गेली.

5 ऑगस्ट   2010 — 

पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीनं वर्षावर मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांची भेट   घेतली.

6 ऑगस्ट   2010–  

समितीनं राजभवनावर राज्यपाल के.शंकरनारायण यांची भेट घेऊन पत्रकारांवरील   वाढत्या हल्लयाबद्दल त्यांच्याकडं चिंता व्यक्त करून कायदा कऱण्याची मागणी केली.

9 ऑगस्ट  2010 –

पत्रकारांवरील वाढत्या हल्ल्याच्या निषेधार्थ क्रातीदिनाच्या निमित्तानं   मुंबईत हुतात्मा चौकात निदर्शने.राज्यभर पत्रकारांची निदर्शने

10 ऑगस्ट 2010 –   

प्रधान सचिव आनंद कुलकर्णी यांच्या दालनात बैठक.कायद्याचा मसुदा तयार  करण्याबाबत चर्चा.पुन्हा 20 तारखेला एकत्र बसण्याचे ठरले.

19 ऑगस्ट  2010–   

पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीच प्रेस क्लबमध्ये बैठक,मसुद्यावर चर्चा.

20 ऑगस्ट  2010–   

आनंद कुलकर्णी यांच्याकडं पुन्हा बैठक.कायद्याच्या मसुद्यावर चर्चा.19 सप्टेंबरला   बैठक घेण्याचं ठरलं.

24 ऑगस्ट  2010–

झी-24 तासचे मुंबई प्रतिनिधी अमित जोशी यांच्यावर हल्ला.

25 ऑगस्ट   2010– 

सकाळी 8 वाजता वर्षावर मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी जाणार्‍या पत्रकारांना पोलिसांनी  रोखले.दुपारी 1 वाजता समितीची मुंबई मराठी पत्रकार संघात बैठक.दुपारी 2 वाजता मुख्यमंत्र्यांची भेट.अशोक चव्हाण,छगन भुजबळ,अजित पवार उपस्थित.पुढच्या कॅबिनेट समोर वटहुकुम काढण्याबाबत निर्णय घेण्याचे अशोक चव्हाण याचे  आश्‍वासन.

7 सप्ेटंबर 2010–

बीड येथील सामनाचे कार्यालय समाजकंटकांनी जाळले.

13 सप्ेटबर 2010– 

सोलापूर येथील झी-24 तासचे पत्रकार संजय पवार यांच्यावर हल्ला.त्यांच्या विरोधातच  अ‍ॅट्रॅसिटी आणि दरोड्याचे गुन्हे दाखल

 14 सप्टेंबर 2010–      

पत्रकार संरक्षण कायद्याबाबत गट नेत्यांची मतं जाणून घेण्यासाठी सहयाद्रीवर   बैठक.कायद्यास बहुतेकांचा विरोध.

25 सप्टेंबर 2010– 

मुंबई मराठी पत्रकार संघात वृत्तपत्र आणि वृत्त वाहिन्यांच्या संपादकांची बैठक.यावेळी  मुंबईतील अनेक संपादक उपस्थित.2 ऑक्टोबर रोजी गांधी जयंतीच्या दिवशी गांधी   पुतळ्याजवळ निदर्शनं कऱण्याचा निर्णय.

2 ऑक्टोबर 2010-

मुंबईतील गाधी पुतळ्याजवळ पत्रकारांची हेल्मेट घालून निदर्शने.

 21 ऑक्टोबर 2010– 

समितीची प्रेस क्लबमध्ये बैठक.1 डिसेंबरपासून सुरू होणार्‍या नागपूर अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विधानभवनासमोर धऱणे धरण्याचा निर्णय.

27 नोव्हेंबर 2010–   

नवे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याशी समितीची मंत्रालयात चर्चा.विषयाचा अभ्यास  कऱण्यासाठी एक महिना वेळ देण्याची मुख्यमंत्र्यांची विनंती.

28 नोव्हेंबर 2010-

नांदेड येथील सामनाच्या कार्यालयावर हल्ला.

2 डिसेंबर 2010 —    

नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात पत्रकाराची निदर्शने 200 पत्रकाराचा सहभाग

5 फेब्रुवारी 2011 — 

नांदेड येथील एका कार्यक्रमात यांना तर झोडपूनच काढले पाहिजे,मिडिया बंद करा असे  अजित पवार यांचे वक्तव्य.केशव घोणसे पाटील आणि अन्य पत्रकारांना पोलिसांची   धक्काबुक्की.

7 फेब्रुवारी 2011

पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीची मुंबईत बैठक.अजित पवार यांच्या बातम्यांवर  बहिष्कार टाकण्याचा एकमुखी निर्णय.15 फेबुवारील महाराष्ट्रात आंदोलनाचा  निर्णय.राज्यपाल के.शंकरनारायण यांची दुसर्‍यांदा भेट

8 फेब्रुवारी 2011–    

मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण याची पुन्हा भेट

9 फेब्रुवारी 2011–   

कॅबिनेट नंतरच्या मुख्यमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेवर समितीचा बहिष्कार.एकही पत्रकार  परिषदेला गेला नाही.

10 फेब्रुवारी 2011 — 

पुण्यात एका कार्यक्रमात अजित पवार बोलायला उठताच सारे कॅमेरे आणि लेखण्या    म्यान  झाल्या.

11 फेब्रुवारी 2011 — 

अजित पवार यांच्या नांदेड येथील वक्तव्याबद्दल शरद पवार यांची कोल्हापुरात  माफी.अजित पवार असे बोलले की नाही यांची शहानिशा कऱण्यासाठी समित  नेमण्याची  सूचना.पवारांची सूचना समितीला अमान्य.15 ला मोर्चा काढण्याच्या  निर्णयावर   समिती  ठाम.

14 फेब्रुवारी 2011 — 

15 च्या मोर्चाच्या तयारीसीठी समितीची मुबईत बैठक.

15 फेब्रुवारी 2011 —

महाराष्ट्रातील 182 तालुके आणि 34 जिल्हयात पत्रकारांचे मोर्चे.आंदोलन यशस्वी.

16 फेब्रुवारी 2011– 

आंदोलनाचा परिणाम असा झाला की,एस.एम.देशमुख यांना 18 वर्षांची आपली नोकरी    सोडावी लागली.

 6 मार्च     2011–  

कृती समितीची पुण्यात बैठक.1 ंमे 2011 रोजी कराड या मुख्यमंत्र्यांच्या गावी    आंदोलनाचा निर्णय.

10 मार्च  2011 –

आयबीएन-लोकमतच्या अलका धुपकर आणि मोहन जाधव यांच्यावर मुरूड जंजिरा येथेजीवघेणा हल्ला.मोतीराम पाटील यांनी हल्ला केल्याचा आरोप.

11 मार्च 2011 –       

मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची भेट.मोतीराम पाटील यांना अटक करण्याची मागणी. मोतीराम पाटील यांना अटक.सुटका.

22 मार्च 2011-        

समितीची पुणे श्रमिक पत्रकार संघात बैठक.कराडला 1 मे रोजी निदर्शनं कऱण्याचा निर्णय.

1 मे 2011  –       

समितीची कराडला निदर्शनं. राज्यभरातून 500 वर पत्रकारांची उपस्थिती.

18 मे 2011 — 

एक बातमी दिल्याबद्दल ऑफिसिएल सिक्रेट अ‍ॅक्टचा भंग झाल्याचा आरोप ठेवत    ताराकांत व्दिवेदी उर्फ अकेला यांच्यावर गुन्हा दाखल आणि त्याना अटक.

 19 मे 2011 —     

पत्रकारांची मंत्रालयावर धडक.रात्री सहयाद्रीवर गृह मंत्र्यांची भेट.वादग्रस्त डीसीपी महाबोले  यांची बदलीची मागणी.अकेलावरील खटला मागे घेण्याचीही मागणी.

21 मे 2011 –

अकेला यांची जामिनावर सुटका.

28-29 मे 2011 —  

मराठी पत्रकार परिषदेचे रोह्यात अधिवेशन.उदघाटन करताना पृथ्वीराज चव्हाण यांनी  कायदा करण्याचे पुन्हा आश्‍वासन दिले.29 तारखेला गोपीनाथ मुंडे यांच्या उपस्थितीत  समारोप.कायद्याला आपला पाठिंबा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

 11 जून 2011–  

मिड-डे चे पत्रकार ज्योतिर्मय डे उर्फ जेडे यांची मुंबईत भरदिवसा हत्त्या

11 जून 2011-     

पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीची आर.आर.पाटील यांच्या राजीनाम्याची आणि अरूण  पटनाईक यांच्या बदलीची मागणी.

13 जून 2011 —

संतप्त पत्रकाराचा मंत्रालयावर धडक मोर्चा.हजारो पत्रकार सहभागी.मोर्चाला पोर्चमध्ये सामोरे आले.जेडेच्या हत्येची सीबीआय चौकशीची मागणी मुख्यमंत्र्यांनी फेटाळली.अधिवेशनात कायदा कऱण्याचे शेकडो कॅमेर्‍यांसमोर आश्‍वासन.

14 जून 2011–

कॉग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांचा पत्रकारांच्या मागणीस पाठिंबा.

 15 जून 2011 — 

कृती समितीचे पत्रकार भवनात लाक्षणिक उपोषण

15 जून 2011–

जे.डे.च्या ह्त्येची चौकशी सीबीआयकडे सोपवावी अशी मागणी कऱणारी अ‍ॅड.पी.व्ही.पाटील  यांची जनहित याचिका उच्च न्यायालयात दाखल.त्यानंतर केतन तिरोडकर आणि एस.बालकृष्णन यांच्याही याचिका दाखल.मराठी पत्रकार परिषद आणि प्रेस क्लबही यामध्ये पार्टी झाले.

17 जून 2011–    

पत्रकार हल्लयांबाबत निर्णय घेण्यासाठी मंत्र्यांची समिती कऱण्याची मुख्यमंत्र्यांची     घोषणा

18 जून 2011–  

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचे पंतप्रधानांना पत्र.देशातील पत्रकारांना कायद्यानं  संरक्षण देण्याची मागणी.

21 जून 2011–    

एन.राम,शेखर गुप्ता,निखिल वागळे,गिरीष कुबेर आदि ज्येष्ठ पत्रकारांचे शिष्टमंडळ चव्हाण यांना भेटले.राज्यात कायदा कऱण्याची मागणी शिष्टमंडळानं केली.मात्र महाराष्ट्र  प्रेस कौन्सिलच्या कल्पनेला विरोध.

23 जून 2011–    

नारायण राणे यांच्या अध्यक्षतेखाली सहा मंत्र्यांचा मंत्रीगट स्थापन.त्यात आर.आर.पाटील,हर्षवर्धन पाटील,जयदत्त क्षीरसागर,विजयकुमार गावित,नितीन राऊत  या मंत्र्यांचा समावेश.

26 जून 2011–   

साबीआय चौकशीची मागणी करणार्‍या जनहित याचिकेवर सुनावणी.पोलिसांतर्फे चौकशी    अहवाल कार्टाला सादर.

27जून 2011–         

जे डे.चे मारेकरी सतीश काल्या आणि त्याच्या साथीदाराला अटक

19 जुलै 2011-

सीबीआयच्या चौकशीची मागणी कऱणार्‍या सर्व याचिका उच्च न्यायालायने फेटाळल्या.

1 ऑगस्ट 2011–    

जे.डे.यांची हत्त्या आणि पत्रकार संरक्षण कायद्याच्या संदर्भात विधानसभेत  चर्चा.नारायण राणे समिती आपला अहवाल एक महिन्यात देईल अशी आर.आर.पाटील  यांची घोषणा

4 ऑगस्ट 2011 —   

नारायण राणे समितीची मुंबईत बैठक

 5 ऑगस्ट 2011–  

पत्रकार हल्ल्याच्या संदर्भात एस.एम.देशमुख यांनी तयार केलेला व्हाईट पेपर ( श्‍वेतपत्रिका ) मुख्यमंत्र्यांना सादर.

15 ऑगस्ट 2011-

विदर्भ बंधन या दैनिकाचे पत्रकार विजय गोंधळी यांचा मंत्रालयासमोर आत्महत्येचा   प्रयत्न.

16 ऑगस्ट 2011–  

राज्यात किती पत्रकारांवर हल्ले झाले याची माहिती माहितीच्या अ  गेली.अनिल गलगली यांनी ही माहिती मागितली होती.मात्र अशी कोणतीही माहिती  उपलब्ध नसल्याचे इ.टी.गौड यांनी त्यांना कळविले.

23 ऑगस्ट 2011-   

राणे समितीची बैठक.कायद्याला विरोधाची भूमिका.

26 ऑगस्ट 2011– 

राणे समितीची मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाबरोबर बैठक.हल्ला विरोधी  समितीची बहिष्कार.

30 ऑगस्ट 2011–

पत्रकार हल्ल्लयासंदर्भात सर्वपक्षीय बैठक घेण्याचे भाजपचं मुख्यमंत्र्यांना पत्र

15 सप्टेंबर 2011–

बीड येथील पत्रकार संजय मालानी यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ हल्ला   विरोधी समितीचा बीड येथे मोर्चा.एस.एम.देशमुख,किऱण नाईक यांनी मोर्चाचे नेतृत्व  केले.पंकजा मुंडे यांनी कायदा झाला पाहिजे असं मत व्यक्त केलं.

26 नोव्हेंबर 2011–     

पत्रकार जिग्न व्होराला जे.डे.हत्त्या कटातील आरोपी म्हणून अटक

29 नोव्हेंबर 2011–     

राणे समितीचा अहवाल फुटला.अहवालात कायद्याला विरोध.नागपूर अधिवेशनावर  मोर्चा काढण्याचा समितीचा निर्णय.

8 डिसेंबर 2011—  

एस.एम.देशमुख यांची मुंबईत पत्रकार परिषद.नागपूर आंदोलनाची माहिती पत्रकारांना  दिली.

 15 डिसेंबर 2011–  

नागपूर येथे पत्रकारांचा मोर्चा.मुख्यमंत्र्याशी चर्चा.ठोस आश्‍वासन नाही.राणे समितीचा अहवाल कॅबिनेट समोर ठेवण्याचं आश्‍वासन.

 17 डिसेंबर 2011–    

एकनाथ खडसे यांनी पत्रकाराना संरक्षण देणारा कायदा करावा अशी मागणी   विधानसभेत केली.

18 डिसेंबर 2011–   

धनंजय मुंडे यांनी विधान परिषदेत हा मुद्दा उपस्थित केला.कायदा कऱण्याचं फौजिया  खान यांचं आश्‍वासन.

26 डिसेंबर 2011–  

प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाचे चेअरमन मार्कन्डेय काटजू यांनी महाराष्ट्रातील पत्रकारांवर   होत असलल्या हल्ल्यासंदर्भात सरकारची कानउघडणी कऱणारे पत्र मुख्यमंत्र्यांना पाठविले.सरकारकडून पत्रास केराची टोपली.

6 जानेवारी 2012–    

पत्रकार दिन राज्यात पत्रकार हक्क संरक्षण दिन म्हणून समितीन साजरा केला.

 18 जानेवारी 2012-   

जळगाव येथील लोकमत कार्यालयावर समाजकंटकांचा हल्ला.

28 जानेवारी 2012-   

महाराष्ट्र टाइम्सच्या मुंबई येथील कार्यालयावर शिवसेना खासदार आनंदराव अडसूळ   यांच्या समर्थकांचा हल्ला.मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला निषेध.

31 जानेवारी 2012-  

पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीची तातडीची बैठक.पृथ्वीराज चव्हाण यांची   नवव्यांदा भेट.3 फेब्रुवारी रोजी मुंबईत निदर्शनं कऱण्याचा निर्णय.मटाचे संपादक   अशोक पानवलकर यांची भेट.

3 फेब्रुवारी 2012-     

मुंबईत आझाद मैदानावर समितीची निदर्शनं.1 मे रोजी दिल्लीत निदर्शनं कऱण्याची समितीची घोषणा.आंदोलनात निखिल वागळे सहभागी.

 22 फेब्रुवारी 2012-   

महामहिम राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांची दिल्लीत भेट

22 फेब्रुवारी 2012       

समितीच्या शिष्टमंडळानं एस.एम.देशमुख यांच्या नेतृत्वाखाली प्रेस कौन्सिल ऑफ   इंडियाचे चेअरमन मार्कन्डेय काटजू यांची दिल्लीत त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली.आपले सरकार बरखास्त करण्याची शिफारस राष्ट्रपतींकडे का करू नये अशी   विचारणा कऱणारी नोटीस त्यांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना काढली.काटजू  यांना तसा अधिकार आहे काय यावरून राज्यात चर्वित चर्वण

ुलै 2012–

बेळगाव तरूण भारतचे संपादक किरण ठाकूर यांच्यावर कर्नाटक विधानसभेत हक्कभंग

26 जुलै 2012 –       

किऱण ठाकूर यांच्यावरील कारवाईच्या विरोधात राजभवनात राज्यपालीची भेट

12 ऑगस्ट 2012-    

रझा अकादमीच्या मोर्चाच्यावेळेस एबीपी माझा,न्यूज-24 आणि टीव्ही-9च्या व्हॅन    जाळल्या.चार पत्रकारांवर हल्ले.

13 ऑगस्ट 2012    

सह्याद्रीवर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची भेट

26 सप्टेंबर  2012   

बीड येथील सुराज्यचे पत्रकार संजय मालानी यांच्यावर हल्ला,बीडमध्ये समितीचा मोर्चा

1 डिसेंबर 2012-     

नागपूर येथे एस.एम.देशमुख आणि किरण नाईक यांनी आमरण उपोषणाचा निर्णय जाहीर केला.या आंदोलनास एस.एम.देशमुख हे ज्या दैनिकाचे संपादक होते त्या दैनिकाच्या  मालकाने विरोध केला.हे आंदोलन मी ज्या पक्षाचा आहे त्या पक्षाच्या विरोधात आहे असा त्याचा दावा होता.हा विरोध झुगारून एस.एम.देशमुख यांनी आंदोलन करण्याचा निर्णय  घेतला.

10 डिसेंबर 2012-      

पत्रकारांच्या लढ्यासाठी एस.एम.देशमुख यांना एक लाखाच्या पगाराच्या दुसर्‍यांदा  पाणी सोडावे लागले.एस.एम.देशमुख यांचा रामप्रहर दैनिकाचा  राजीनामा

12 डिसेंबर 2012 –      

नागपूर येथे एस.एम.देशमुख आणि किरण नाईक यांचे आमरण उपोषण

 13 डिसेंबर 2012 – 

मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची बाराव्या वेळेस भेट.कायदा करण्याचे,अधिस्वीकृती  समिती गठीत कऱण्याचे आश्‍वासन.

 9 फेब्रुवारी  2013 

पुर्णा येथील पत्रकार दिनेश चौधरी यांच्यावर अ‍ॅसिड हल्ला.पत्नी,मुलगीही जखमी.

16 फेब्रुवारी  2013  

परभणी  येथे एस.एम.देशमुख यांच्या नेतृत्वाखाली पत्रकारांचा भव्य मोर्चा

 20 मार्च      2013 

आयबीएन-लोकमतचे संपादक निखील वागळे आणि एबीपी माझाचे संपादक राजीव  खांडेकर यांच्यावर हक्कभंग प्रस्ताव

 25 मार्च    2103   

संपादकांवरील हक्कभंग आणि दिनेश चौधरीवरील हल्लयाच्या निषेधार्थ पत्रकारांची      राज्यभर निदर्शने

4 एप्रिल    2013  

मंत्रालयात समितीची बैठक.पनवेल ते वर्षा कार रॅली काढण्याचा निर्णय.

8 मे  2013     –

पनवेल ते वर्षा कार रॅली.रॅलीत 80 कार आणि 300 पत्रकार सहभागी.आर.आर.पाट आझाद मैदानावर सामोरे आले.

15 जुलै 2013-       

समितीची औरंगाबादे बैठक.सर्वपक्षीय राजकारणी पत्रकारांच्या मागण्यांकडं दुर्लक्ष करीत असल्याबद्दल मराठी पत्रकार परिषदेच्या 39 व्या अधिवेशनास कोणत्याही राजकारण्याला    न बोलविण्याचा निर्णय

24, ऑगस्ट 2013-   

औरंगाबाद येथे मराठी पत्रकार परिषदेचे 39 वे अधिवेशन.मुख्यमंत्र्यांसह सर्वपक्ष नेत्यांवर बहिष्कार.अधिवेसनास 2000 पत्रकार उपस्थित.

25 सप्टेंबर 2013 – 

अण्णा हजारे यांची राळेगण सिंदी येथे बैठक.पत्रकार संरक्षण कायद्यास पाठिंबा  असल्याचा अण्णांचा पुनरूच्चार.

16 नोव्हेंबर 2013 –

राष्ट्रीय पत्रकार दिन राज्यात काळा दिवस म्हणून साजरा.

12 डिसेंबर 2013-  

वेळोवेळी सरकारनं पत्रकारांच्या मागण्यांसदंर्भात दिलेल्या आश्‍वासनाची सरकारला आणि   अन्य नेत्यांना आठवण करून देण्यासाठी नागपूर अधिवेशन काळात आठवण  आंदोलन.मुख्यमंत्र्यांसह अनेकांच भेटी

5 फेब्रुवारी   2014 – 

राळेगणसिध्दी येथे अण्णा हजारे यांची भेट.व्हिसल ब्लोअर बिलात आरटीआय कार्यकत्यार्ंप्रमाणेच पत्रकारांचा उल्लेख करावा अशी सूचना अण्णंनी केली.

10 फेब्रुवारी  2014  

पुणे जिल्हयातील आंबेगाव येथील कार्यक्रमात एसएमदेशमुख यांनी दिलीप वळसे   पाटलांनी लक्ष घालण्याची विनंती केली.

17 फेब्रुवारी  2014  

जिल्हा माहिती कार्यायांना राज्यभर घेराव आंदोलन

14 जून 2014     

वळसे पाटलांकडे मंत्रालयात बैठक.आर आर पाटीलयांची उपस्थिती.आबांनी कायदा आपला पाठिंबा असल्याचे सांगितले.

15 जून 2014          

एस एम देशमुख यांनी पुण्यात केंर्दीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांची     भेट घेतली.केंद्रात कायदा करण्याचे त्यांचे आश्‍वासन

16 जुलै 2014 –      

पत्रकारांच्या प्रश्‍नावर लोकसभेत चर्चा.जर्नालिस्ट वेलफेअऱ स्कीम आणण्याची आणि पत्रकारांवरील हल्ल्याची स्वतंत्र नोंद ठेवण्याची जावडेकर यांची घोषणा

19 जुलै 2014 –  

सातारा जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या कार्यक्रमात बोलताना अजित पवार यांनी कायदा   कऱण्यास आपला पाठिंबा असल्याचे आणि त्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे   जाहीर केले.

7 जून 2015-       

मराठी पत्रकार परिषदेचे पिंपरी-चिंचवड येथे 40 वे अधिवेशन.या अधिवेशनाचे उद्दघाटन   करताना पेन्शनचा प्रश्‍न दोन महिन्यात निकाली काढण्याचे आणि कायद्याबद्दल  सर्वसंबंधित घटकांशी चर्चा करून मार्ग काढण्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची   घोषणा.

२३ जून २०१५   —–   

राज्यपाल के .विद्यासगर राव यांची भेट.कायदा झाला पाहिजे आणि मी त्यासाठी  मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिणार असल्याचे राज्यपालांचे आश्‍वासन

२८ जून २०१५ ——–

विद्यासगर राव यांचे cm ला पत्र क़ाय दा करण्याची सूचना

11 जुलै 2015 –       

प्रेस क्लबचा युपीतील आणि एमपीतील पत्रकारांच्या झालेल्या हत्येबद्दल मेणबत्ती    मोर्चा

10 जुलै 2015 –       

प्रेस कौन्सिल ऑफ इंडियानं पत्रकारांवरील हल्ल्याच्या संदर्भात नेमलेल्या उपसमितीचा  अहवाल पीसीआयनं स्वीकारला.त्यात कायदा करण्याची शिफारस केली गेली.

१३ जुलै  २०१५ –   

–  महाराष्ट्रात समितीचे एसएमएस आंदोलन.घंटानाद आंदोलन.सीएम आणि दोन्ही   विरोधी पक्ष नेत्यांना 15 हजाराच्या वर एसएमएस पाठवून कायदा कऱण्याची   मागणी.राज्यातील 322 तालुक्यात घंटानाद आंदोलन यशस्वी झाले.या अनोख्या  आंदोलनाची राज्यभर चर्चा.नंतर समितीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच            राधाकृष्ण विखे पाटील आणि धनंजय मुंडे या दोन्ही विरोधी पक्ष नेत्याची भेट घेऊन कायदा कऱण्याची मागणी केली.

13 जुलै 2015 –     

मंत्रालय आणि विधिमंडळ पत्रकार संघाच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीस यांचे  कायद्याच्या बाबतीत आम्ही सकारात्मक असल्याचे वक्तव्य.राधाकृष्ण विखे  पाटील,धनंजय मुंडे यांची कायदा कऱण्याची जाहीर मागणी.विधान परिषदेचे अध्यक्ष रामराजे निंबाळकर यांनीही कायदा करण्याच्या मागणीस पाठिंबा.हरिभाऊ बागडे  यांची पत्रकारांचे प्रश्‍न सोडविण्याची मागणी.

१७ जुलै  २०१५       

टीव्ही जर्नालिस्ट असोसिएशनचे काळ्या फिती लावून आंदोलन,मुख्यमंत्र्यांची घेतली    भेट

19  जुलै 2015- 

अमरावती येथील श्रमिक पत्रकार संघाच्या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी कायद्याबाबत    आम्ही   सकारात्मक असल्याच्या वक्तवयचा पुनरूच्चार केला.

21 जुलै 2015 –     

धनंजय मुंडे यांनी दाखल केलेल्या लक्षवेधीवर चर्चा

22  जुलै 2015-       

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समवेत पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीची   बैठक.एक   महिन्यात  कायद्याचा ड्राफ्ट कऱण्याचा ,पेन्शनचा मुद्दा मार्गी लावण्याचे आश्‍वासन.पंधरा दिवसात   अधिस्वीकृती समिती गठीत कऱण्याचा आदेश.

22 जुलै 2015 –         

नाशिक जिल्हयातील बागलणच्या आमदार दीपिका चव्हाण यांनी सभागृहात  आचित्याच्या   मुद्याव्दारे प6कार हल्ल्याचा विषय उपस्थित केला.

23 जुलै2015 –      

विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यानी लक्षवेधीच   पत्रकार     हल्ल्याचा विषय उपस्थित केला.त्यावर एक महिन्यात   कायद्याचा ड्राफ्ट तयार करण्याचं गृह  राज्यमत्री राम शिंदे याचं आश्‍वासन.

24 जुलै 2015                    

वसई-विरारच्या पत्रकारांचं आझाद मैदानावर बनियन आंदोलन

31 जुलै 2015 – 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विधान परिषदेत कायदा करण्याबाबत   पुनरूच्चार.अधिवेशनाचा शेवटचा दिवस

4 ऑगस्ट 2015-      

पत्रकारांवरील हल्ल्यांचा प्रश्‍न लोकसभेत उपस्  गृहराज्य मंत्री चौधरी यांनी प्रश्‍नाना उत्तर देताना देशात 2014मध्ये 113 पत्रकारांववेळ हल्ले झाल्याची माहिती दिली.महाराष्ट्रात 2014 मध्ये केवळ पाचच पत्रकारांवर हल्ले   झाल्याचे चौधरी यांचा दावा.

 13 ऑगस्ट 2015-       

पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीने सातत्यानं केलेल्या पाठपुराव्य 13 ऑगस्ट 2015 रोजी अधिस्वीकृती समिती पुनर्गठीत कऱण्यात आली जवळपास सहा वर्षे ही समितीच अस्तित्वात नव्हती.

25  ऑगस्ट 2015-     

कायदा आणि पेन्शनसंदर्भात मुख्यमंत्र्यांनी दिलेल्ल्या आश्‍वासनास एक महिना पूर्ण प्रगती कुठपर्यतं आलीय हे पाहण्यासाठी माहिती महासंचालक चंद्रशेखर ओक यांची भेट  घेतली.कायद्याचा मसुदा तयार असून पेन्शनचा विषयही मार्गी लागण्याच्या टप्पयावर   असल्याचे ओक यांनी स्पष्ट केलं.

20 सप्टेंबर 2015      

उस्मानाबादचा राम खटाडे ( दीव्य मराठी ) आणि परभणीचा शिवाजी क्षीरसाग   ( देशोन्नती) सातार्‍याचा हनुमंत बर्गे ( पुढारी) यांना आजारात मदत मिळवून  देण्यासाठी प्रयत्न

18 नोव्हेंबर 2015      

जून अधिवेशनात गृहराज्य मंत्री राम शिंदे यांनी एक महिन्यात पत्रकार संरक्षण कायद्याचा मसुदा तयार करण्यात येईल असे आश्‍वासन सभागृहात दिले होते.त्याचे काय झाले याची माहिती घेण्यासाठी सभापती रामराजे निंबाळकर यांनी  संबंधित आमदार आणि गृहमंत्री यांची बैठक घेतली. बैठकी नंतर एस.एम.देशमुख किरण नाईक, आणि मिलिंद अष्टीवकर यांनी तिघांबरोबर   चर्चा करून कायदा लवकरात लवकर करण्याचा आग्रह धरला.

24  नोव्हेंबर 2015    

   पत्रकारांच्या एकजुटीचा विजय,नाशिक येथील पत्रकार महेंद्र महाजन यांना    मारहाण    करणारे पोलिस उपायुक्त अविनाश बारगळ यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले  आहे.चौकशी होईपर्यंत ते कामावर असणार नाहीत.

1 डिसेंबर 2015 –      

        माहिती आणि जनसंपर्क विभागाच्यावतीने आयोजित पत्रकार पुरस्कार वितरण   समारंभात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शासन पत्रकार संरक्षण कायदा आणि   पत्रकार पेन्शनसाठी वचनबध्द असल्याची पुन्हा ग्वाही दिली.कायद्याचा मसुदा  तयार असून तो पत्रकार संघटनांना दाखविला जाईल असेही त्यांनी स्पष्ट केले.

7 डिसेंबर 2015         

            पत्रकार संरक्षण कायद्याच्या मागणीसाठी दिल्लीत पत्रकारांची निदर्शने

10 डिसेंबर 2015         

      पत्रकार हल्ला विरोधी कायद्याचा मसुदा अखेर तयार.हा मसुदा अवलोकनार्थ  पत्रकार संघटना  पाठविला.मराठी पत्रकार परिषदेलाही मसुदा प्राप्त.त्यावर एक महिन्यात  सूचना.आक्षेप नोंदविण्याची सूचना.

16 डिसेंबर 2015 ः    

    पत्रकार संरक्षण कायदा,पेन्शन आणि सिंधुदुर्ग जिल्हयातील पत्रकार भवनाचा प्रश्‍न नितेश राणे यांनी विधानसभेत औचित्याच्या मुद्याच्याव्दारे उपस्थित केला.

16 डिसेंबर 2015    

विधान परिषदेत धनंजय मुंडे आणि अन्य सहा आमदारानी तारांकित प्रश्‍नाच्या   माध्यमातून पत्रकारावरील हल्ल्याचा मुद्दा उपस्थित केला.त्यावर उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी राज्यात सात दखलपात्र आणि दोन अदखपात्र गुन्हे दाखल झाले   सात प्रकरणात आरोपींना अटक करून त्याचे चार्जशीट कोर्टात पाठविल्याचे सांगितले.

17 डिसेंबर 2015-       

  नांदेड जिल्हयातील देगलुर येथील सार्वभौम जनता साप्ताहिकाचे कार्यालय बुलडोझर  लावून उद्वस्थ केले.साप्ताहिकात नगरापालिकेच्या विरोधात लेखमाला प्रसिध्द झाली होती.तसेच मुख्याधिकाऱी यांच्या भ्रष्टाचारीची चौकशी कऱण्याची मागणी साप्ताहिकाचे  संपादक विवेक केरूरकर यांनी डीजींकडे केली होती.त्या रागातून सीओंनी ही कारवाई  केली.

17 डिसेंबर 2015 –    

        सोलापूर जिल्हयातील करमाळा येथे पुण्यनगरीच्या अंकाची होळी केली    गेली.राष्ट्रवादीच्या     बागल गटाने हे कृत्य केले.दिग्विजय बागल यांच्या मुलाखतीस  उत्तर देणारी आमदार नारायण पाटील यांची मुलाखत प्रसिध्द झाल्याने संतापून बागल  गटाने हे कृत्य केले.

18    डिसेंबर 2015 

    नागपूर जिल्हयातील खापरखेडा येथील पत्रकार अरूण म्हात्रे यांनी अवैद्य रेती  वाहतुकीची बातमी छापल्याबद्दल चिडून पीआय भीमराव देढे यानी त्यांच्या विरोधात    खोटा गुन्हा दाखल केला

6 जानेवारी 2016 ः

 शिवसेना पक्ष प्रमुख उद्धवजी ठाकरे यांनी ठाणे येथे पत्रकार संरक्षण कायदा आणि   पेन्शनच्या मागणीस पाठिंबा दिला.एस.एम.देशमुख यांनी त्यांच्याकडे हा प्रश्‍न उपस्थित केला होता.

1 मार्च 2016ः   

          विधिमंडळ वार्ताहर संघाच्या पदाधिकार्‍यांबरोबर वार्तालाप करताना मुख्यमंत्र्यांनी पत्रकार  पेन्शनचा विषय मार्गी लावण्याचे आश्‍वासन दिले.

1 मार्च 2016ः      

   पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीच्यावतीने चाळीसगावचे आमदार उन्मश पाटील    यांच्या मदतीने अर्थ मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची मंत्रालयात भेट घेतली.अर्थसंकल्पीय   अधिवेशनात पेन्शनची घोषणा कऱण्याची मागणी.

4 मार्च 2016 ः     

पत्रकार पेन्शन आणि पत्रकार संरक्षण कायद्याच्या मागणीस पाठिंबा देणारी 60 आमदारांची पत्रं मिळाली.हल्ला विरोधी कृती समितीने आमदार-खासदारांची पाठिंबा पत्रे    मागविली होती.

10 मार्च 20

पत्रकार पेन्शन योजना याच अधिवेशनात मार्गी लावण्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवी यांची घोषणा.विधीमंडळ वार्ताहर संघाकडून आयोजित मीट द प्रेस कार्यक्रमात ते बोलत होते.

5 मार्च 2016    

   राज्यातील सर्वपक्षीय आमदारांकडून पत्रकारांच्या मागणीस पाठिंबा पत्रे मिळविण्याचे आवाहन.आवाहनास चांगला प्रतिसाद

13 मार्च 2016    

  आठ दिवसात 90 आमदारांची पत्रे मिळाली.ती 15 मार्च रोजी मुख्यमंत्र्यांना सादर करणार

15 मार्च 2016   

    महाराष्ट्रात पुन्हा एकदा एसएमसएस भडिमार आंदोलन.15 हजार एसएमएस  पाठविले.मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन १६०  आमदारांची पत्रे त्यांना सादर

25 एप्रिल 2016 – 

   कायदा,पन्शन,मजिठिया आणि जाहिरात दरवाढीच्या मागणीसाठी राज्यभर डीआयओ कार्यालयासमोर परिषदेच्यावतीने निदर्शने

3 जुलै 2016 ः

 पुणे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्यावतीने आयोजित जिल्हा स्तरीय अधिवेशनात बोलताना   शरद पवार यांनी प्रथमच पत्रकार पेन्शन आणि पत्रकार संरक्षण   कायद्याच्या मागणीस पाठिंबा दर्शविला.पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीला बरोबर घेऊन   मुख्यमंत्र्यांंची भेट घेण्याची तयारी शरद पवार यांना  एस.एम.देशमुख यांनी त्यासंदर्भात त्यांच्याकडे मागणी केली होती.

22 ऑगस्ट 2016ः

 नवनिर्वाचित महासंचालक श्री .ब्रिजेशसिंग यांच्याशी चर्चा.पेन्शन,संरक्षण कायदा आणि  पत्रकारांच्या अन्य प्रश्‍नांसंदर्भात सविस्तर चर्चा

2 सप्टेंबर 2016  

 उस्मानाबाद येथील गावकरीच्या कार्यालयावर हल्ला.पत्रकार सुनील ढेपे यांच्याव बलात्कार,विनयभंग,अ‍ॅट्र्रॉसिटीसारखे गंभीर खोटे गुन्हे दाखल.त्यांना अटक.महाराष्ट्र भर  निषेध

21 सप्टेंबर 2016 ः

 पत्रकारांवर दाखल होणार्‍या खोटया गुन्हयांच्या संदर्भात विचारविनिमय करून निर्णय  घेण्यासाठी पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीची बैठक.

2 ऑक्टोबर 2016 ः

   महाराष्ट्रातील पत्रकारांचे 36 जिल्हयात निषेध मोर्चे,या मोर्चांना प्रचंड यश.पत्रकार एक    झाले.

28 नोव्हेंबर 2016ः 

       मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची भेट.

30 नोव्हेंबर 2016 ः

 25 डिसेंबरच्या नादेड मेळाव्याच्या तयारीसाठी पुण्यात मराठी पत्रकार परिषदेची बैठक

 9 डिसेंबर 2016 ः

 कॉग्रेसचे विधान परिषदेतील सदस्य संजय दत्त यांनी विधान परिषदेत विषय उपस्थित   केला.

14 डिसेंबर 2016 ः

पत्रकार संरक्षण कायद्याचा मसुदा येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मांडणार ,मुख्यमंत्री   देवेंद्र फडणवीस यांचे आश्‍वासन .कॉग्रेसचे संजय दत्त यानी विचारलेल्या लक्षवेधीवर  मुख्यमंत्र्यांचे उत्तर .

26 फेब्रुवारी 2017ः

 शिवसग्रामचे नेते विनायक मेटे यांनी केज येथील कार्यक्रमात बोलताा देशमुख तुमच्या  हयातीत तरी पत्रकार संरक्षण  कायदा होत नसल्याचे सूतोवाच केले होते.

15 मार्च 2017 ः

 अब्दुलखान दर्राणी,धनंजय मुंडे,सतीश चव्हाण आदि सदस्यांनी तारांकित प्रश्‍नाव्दारे 7    डिसेंबर 2016 रोजी मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या उत्तराच्या संदर्भात काय कारवाई झाली असा  प्रश्‍न उपस्थित केला होता.त्यावर उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार संरक्षण कायद्याचा प्रारूप आराखडा तयार करण्यात आला असून त्याला मंत्रिमंडळाची  मान्यता घेण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे सांगितले.पत्रकार पेन्शनच्या बाबतीत विविध पर्यायांची पडताळणी केली जात आहे.जाहिरात धोरण नक्की करण्यासाठी 24 जानेवारी  2017 रोजी अभ्यासगटाची नियुक्ती करण्यात आली आहे.मजिठियाबाबत कामगार आयुक्तांमार्फत  कारवाई सुरू आहे.2 ऑक्टोबर रोजी या चारही मागण्यांसाठी मराठी पत्रकार  परिषदेने आंदोलन   केले होते.

15 मार्च 2017

विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे याची एस।एम.देशमुख ,किऱण नाईक आणि आय.के.जैन यांनी विधानभवनात भेट घेतली तर विधीमंडळ वार्ताहर संघाचे अध्यक्ष दिलीप सपाटे यांनी टोल माफीसाठी महसुलमंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट घेतली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here