Thursday, June 1, 2023
Home बातमीदार विशेष ‘मी टोलमाफीचा लाभार्थी नाही’…

‘मी टोलमाफीचा लाभार्थी नाही’…

0
1211

‘मंत्रालयातील पत्रकारांनी लाटली टोलमाफी’ या मथळ्याखाली एक पोस्ट व्हायरल झालेली आहे.या पोस्टमध्ये हे ‘लाटणं’ सुरू होतं तेव्हा मराठी पत्रकार परिषद झोपली होती काय ? असा सवाल केला गेेलेला आहे..मी या टोलमाफीचा लाभार्थी आहे काय असाही प्रश्‍न विचारला  आहे.माझ्यावर झालेल्या आरोपांना उत्तरं देत बसण्याची माझी पध्दत नाही..तेवढा वेळही माझ्याकडं नाही..कारण पत्रकारांसाठी अनेक सकारात्मक गोष्टी अजून करायच्या आहेत.मात्र  परिषदेच्या काही सभासदांनी याबाबतचा खुलासा करावा अशी सूचना केल्यानं हा खुलासा मी करीत आहे..

मंत्रालयातील पत्रकारांना मा.श्री.एकनाथ शिंदे यांनी टोलमाफीची सवलत आणि पासेस दिले याची पूर्ण कल्पना मला होती.मात्र मी त्यावर काही बोललो नाही..याचं कारण असं होतं की,पत्रकारांनी इतरांना काय मिळालं ..मला का नाही मिळालं असे वाद पत्रकारांनी घालत बसू नयेत असं माझं मत होतं.आहे..यातून शहरी विरूध्द ग्रामीण असाही वाद सुरू होऊ शकला असता.पत्रकारांमध्येही फूट पडल्याचं चित्र जगाला दिसलं असतं..ते मला मान्य नाही.पत्रकारांनी आपसात कोणत्याही कारणांनी कोणतेही वाद करू नयेत अशी माझी पहिल्यापासूनची धारणा असल्यानं मंत्रालयातील मित्रांना टोलमाफी मिळाली तरी मी त्यावर बोललो नाही अथवा ‘जळलो’ देखील नाही.त्यामुळं परिषदेला याची कल्पना नव्हती किंवा परिषद झोपली होती असं नाही.

राहिला मुद्दा माझा लाभार्थी असण्याचा..मी नम्रपणे सांगू इच्छितो की,मी टोलमाफीचा लाभार्थी नाही.एवढंच नव्हे तर एस.टी.महामंडळाकडून अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना मिळणारे मोफत प्रवासाचे कार्डही मी घेतलेले नाही..माझ्याकडं मुलानं घेतलेली एक छोटी गाडी आहे.. टोलवर मी रितसर आणि प्रामाणिकपणे टोल भरतो..अधिस्वीकृती कार्ड दाखवूनही मी कधी टोल भरण्याचं टाळत नाही…हे कृपया संबंधितांनी लक्षात असू द्यावे..पत्रकारांना टोलमाफी मिळावी याला संघटना म्हणून नव्हे पण व्यक्तिशः माझा विरोध आहे.याचं कारण ग्रामीण भागात किती पत्रकारांकडं गाड्या आहेत? .त्यामुळं टोलमाफी झाली तर हा लाभ देखील ठराविक गडगंज पत्रकारांना मिळणार आहे.ते मला मान्य नाही. अधिस्वीकृती समिती ही काही पत्रकार संघटना नाही पण तिकडेही टोलमाफीसह आपल्या कार्यकक्षेबाहेरच्या अनेक विषयांवर तावातावाने चर्चा होते.मात्र टोलमाफीला माझा बैठकीतही विरोध असतो.कारण ही टोलमाफी केवळ अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना मिळावी असा तिकडं आग्रह असतो.ते मला मान्य नाही.टोलमाफी व्हायचीच असेल तर ती सरसकट झाली पाहिजे.विशिष्ट हितसंबंधी गटांनाच सवलती मिळण्यास माझा विरोध आहे.तरी ही टोल सारखे फुटकळ  विषय घेऊन आपण पत्रकारांच्या बुनियादी प्रश्‍नांकडं दुर्लक्ष होऊ देण्याचं कारण नाही.असे माझे आजही ठाम मत आहे . मजिठियाच्या अंमलबजावणीचा प्रश्‍न आहे..छोट्या वृत्तपत्रांवर ओढवलेल्या संकटाचा विषय आहे..त्यावर काही करता आलं तर बघू असं मला वाटतं.

मंत्रालायतील मित्रांनी स्वतःसाठीच टोल माफी का मिळवावी ? त्यांनी इतरांसाठीही असा का आग्रह धरू नये ?यावर मला काही भाष्य करायचे नाही..हे ज्याचं त्यांनी पहावं..

एस.एम.देशमुख 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!