अलिबागः भाजपाच्या मोदी सरकारने दिलेली आश्‍वासने पाळली नाहीत,जनतेचा भ्रमनिराश केला त्यामुळं 2019 च्या निवडणुकीत मोदी सरकार सत्तेवर तर येणार नाहीच शिवाय महाराष्ट्रातही मुख्यमंत्री शिवसेनेचाच होईल असे रोखठोक प्रतिपादन सामनाचे कार्यकारी संपादक शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी केले.
अलिबाग प्रेस असोसिएशनच्या दहाव्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं संजय राऊत यांच्या प्रकट मुलाखतीचा कार्यक्रम काल अलिबागेत संपन्न झाला.संजय भुस्कुटे यांनी संजय राऊत यांची मुलाखत घेतली.
संजय राऊत यांनी मोदी सरकारवर चौफेर टीका केली.सरकारनं चार वर्षात कोणतीच ठोस कामं केली नसल्यानं त्यांचं संख्याबळ 100 ने घटेल असा दावा त्यांनी केला.
कोकणात प्रकल्प येणार असतील तर त्याचं स्वागत आहे पण जनतेला उद्दवस्थ करणार्‍या प्रकल्पाांना आमचा विरोध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here