महाराष्ट्रातील पत्रकारांच्या सोळा संघटना एकत्र आल्या आणि पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीच्या नेतृत्वाखाली पत्रकार संरक्षण कायद्याची लढाई त्यांनी लढली.ती यशस्वी झाली.महाराष्ट्रातील या ऐतिहासिक लढ्याचं अनुकरण आता मध्य प्रदेशात होत असून तेथेही पत्रकारांच्या विविध बारा संघटनांनी एकत्र येत पत्रकार संरक्षण कायद्यासाठीचे रणशिंग फुंकले आहे.राज्यातील सर्व पत्रकारांनी 15 जानेवारी रोजी भोपाळला महारॅलीचे आयोजन केले आहे.पत्रकार संरक्षण कायदा व्हावा या प्रमुख मागण्यांसह पत्रकारांच्या अन्यही काही मागण्या आहेत.मध्य प्रदेशातील पत्रकारांच्या या लढयात पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती त्यांच्यासोबत आहे.पंधरा तारखेची ही महारॅली यशस्वी व्हावी यासाठी हार्दिक शुभेच्छा–