अपघात झाल्यास सदोष मनुष्यवधाचा गुन्हा

0
692

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर रस्त्याच्या दुरावस्थेमुळे अपघात झाल्यास संबंधीत बांधकाम ठेकेदारास जबाबदार धरून त्याच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन् दाखल कऱण्याचे आदेश नूतन जिल्हाधिकारी शीतल तेली-उगले यांनी दिलाआहे.त्याची अंमलबजावणी करण्यासाठी उपजिल्हाधिकारी सतीश बागल यांनाआदेश देण्यात आल्याने ठेकेदारांचे धाबे दणाणले आहे.मुंबई-गोवा महामार्गाची दुरवस्था आणि रस्त्य्यांच्या अपुर्‍या कामांमुळे महामार्गावरजीवघेणी परिस्थिती निर्माण होत आहे.त्यामुळे अपघात आणि त्यात होणार्‍या मृत्यूची संख्या वाढत आहे.ही बाब जिल्हाधिकार्‍यांच्या निदर्शनासआणून दिल्यानंतर त्यांनी वरील महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here